The first phase of selection of Vice Chancellor of Shivaji University has been completed, 28 interviews
The first phase of selection of Vice Chancellor of Shivaji University has been completed, 28 interviews 
कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा पहिला टप्पा पूर्ण, 28 जणांच्या मुलाखती

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी असणाऱ्या निवड प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाला. यामध्ये 28 जणांच्या मुलाखती शोध समितीमधील सदस्यांनी घेतल्या. यातील पाच नावांची अंतिम यादी कुलपती कार्यालयाकडे पुढील दोन दिवसांत पाठवली जाईल. 
शनिवारी (ता. 26) बहुतांशी उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या. आज शोध समितीने मुलाखतींमधील गुणानुसार अंतिम पाच नावांची निवड करण्याचे काम सुरू केले आहे. पुढील दोन दिवसात अंतिम पाच जणांची निवड करून त्यांची नावे कुलपती कार्यालयाकडे पाठवली जातील. त्यानंतर पाच जणांना मुलाखतींचे मेल पाठवले जातील. कुलपती स्वतः त्यांच्या मुलाखती घेऊन अंतिम नावाची कुलगुरू म्हणून घोषणा करतील. ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही घोषणा होऊन नवे कुलगुरू कार्यभार स्वीकारतील असा अंदाज विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पहिल्या टप्प्यातील मुलाखतींना प्रत्येक उमेदवाराला वीस ते पंचवीस मिनिटेच वेळ मिळाला होता. कुलगुरू पदासारख्या महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित पदासाठी एवढ्या कमी कालावधीत मुलाखत घेणे अन्यायी असल्याची खंत काही उमेदवारांनी व्यक्त केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT