five more corona positive patient found in kolhapur
five more corona positive patient found in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर ; दिवसाच्या शेवटी धक्का ; पाच जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - गेल्या दहा-बारा दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना आज तेराव्या दिवशी जिल्ह्याला दिलासा मिळाला होता. आज (दि. २६) दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाचा रूग्ण सापडला नाही. परंतु, नुकत्याच हाती आलेल्या अहवालानूसार पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्ह्यात आज दिवसभर 1762 करून तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र, रात्री सव्वानऊ वाजता आलेल्या रिपोर्टनुसार नव्याने पाच कोरोना रुग्णांची भर पडली आहे त्यामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात 383 रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, काल दिवसभरात ३७ बाधितांची भर पडली होती. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३७८ वर पोचली होती. आता पाच जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने ही संख्या आता 383 वर पोहोचली आहे. काल अहवाल पॉझिटिव्ह आलेले सर्व जण अलगीकरण कक्षात असून त्यांना रात्री उशिरापर्यंत सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे काम सुरू होते. 

शिवाय काल कोरोनामुक्त झालेल्या सहा जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे होऊन घरी गेलेल्या एकूण रुग्णांची संख्या २० वर पोचली आहे. दोन रुग्णांचा यापूर्वीच मृत्यू झाला असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : खराब सुरूवातीनंतर लखनौनं डाव सावरला; राहुलची आक्रमक फलंदाजी

DC vs MI, IPL 2024: डेव्हिडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

SCROLL FOR NEXT