Hatkanangale Lok Sabha constituency Shiv Sena M dhairyashil mane demand Maratha Reservation Center should get it 
कोल्हापूर

''केंद्र सरकारने कंगना राणावतकडे लक्ष देण्यापेक्षा रानावनात काम करणाऱ्यां मराठा तरुण-तरुणींकडे लक्ष द्यावे'' : धैर्यशील माने

सागर कुंभार

रुकडी (कोल्हापूर)  : "केंद्रशासनाने तमिळनाडूच्या आरक्षणाप्रमाणे महाराष्ट्रातील मराठा समाजास आरक्षण देऊन या समाजातील तरुण-तरुणींना  मुख्य प्रवाहामध्ये आणावे.मराठा आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये होण्यासाठी केंद्रानेही महाराष्ट्र राज्यासारखा पुढाकार द्यावा. कंगना राणावतकडे लक्ष देण्यापेक्षा रानावनात काम करणाऱ्या मराठा समाजातील उपेक्षित तरुण-तरुणींकडे लक्ष द्यावे आणि मराठा आरक्षण केंद्राने मिळवून द्यावे"अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी संसद अध्यक्ष ओम बिर्ला यांचेकडे केली. यावेळी ते दिल्ली येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये बोलत होते.

 महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण देशभर गाजत आहे. मराठा आरक्षणामुळे या समाजातीली तरुण-तरुणींना नवसंजीवनी मिळणार आहे.महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या बत्तीस टक्के लोकसंख्या ही मराठा समाजाची असून त्यापैकी नव्वद टक्के समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्भल व आर्थिकदृष्ट्या मागास आहे. सध्या तामिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण दिले आहे.

मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव केला जात आहे. मी ज्या जिल्ह्यातून आलो आहे तो कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी शाहू महाराजांचा जिल्हा आहे. त्यांनी देशाला आरक्षणाची देण दिली मात्र महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना मराठा आरक्षणासाठी झगडा करावा लागत आहे. त्यामुळे मराठा आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये होण्यासाठी केंद्रानेही महाराष्ट्र राज्यासारखा पुढाकार द्यावा व  मराठा आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत केली आहे.   

संपादन - अर्चना बनगे
                         

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 4th T20I : भरवशाच्या म्हशीला टोणगा! भारताच्या फलंदाजांनी माती खाल्ली, श्रेयस अय्यरच्या खेळीने लाज वाचवली

Ashadhi Wari : आनंदोत्साहात पालखी सोहळा पुण्यनगरीमध्ये

IND vs ENG 4th T20I : पुन्हा तेच... वैभव सूर्यवंशी IPL समजून खेळायला गेला अन् जोफ्रा आर्चरने पुन्हा कार्यक्रम केला... Video

Sakal Impact : ई-सकाळच्या बातमीचा परिणाम; वेळ नदीवरील खचलेला पूल रातोरात दुरुस्त, वाहतूक पुन्हा सुरळीत

राज्यातील लाखो झोपडपट्टीवासीयांना दिलासा! २०११ पूर्वीच्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता; महायुती सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT