कोल्हापूर

लाखोंच्या नुकसानापेक्षा लाखातले घर बरं..! चिखलीकरांची भावना

संदिप खांडेकर

कोल्हापूर : महापुराच्या तडाख्यातून जीव वाचविण्यासाठी प्रयाग चिखलीतील पन्नासहून अधिक ग्रामस्थांनी सोनतळीमध्ये घर बांधणीचा वेग वाढवला आहे. लाखो रुपयांचे नुकसान होण्यापेक्षा लाखातले घर बरं, ही त्यांची भावना आहे. 
गतवर्षीच्या दिवाळीनंतर सोनतळीत जागांसाठी एक हजार अर्ज आले आहेत. मात्र, रेकॉर्ड उपलब्ध नसल्याने नेमक्‍या जागा शिल्लक किती, याचा अंदाज चिखली ग्रामपंचायतीला आलेला नाही. त्यामुळे जागांच्या फेरसर्वेक्षणाचा मुद्दा पावसाळ्याच्या तोंडावर चर्चेत आला आहे. 
चिखलीने 1970 रोजी भारतातील "आदर्श गाव' म्हणून पुरस्कार मिळवला आहे. पंचगंगा नदी काठावरच्या गावाने लोकवर्गणीतून लोकोपयोगी कामे करून विकासाचे प्रारूप उभे केले. शेतीसह पूरक व्यवसायावर गावाची भिस्त आहे. पंचवीस गुऱ्हाळघरे गावाच्या परिसरात आहेत. त्यांचे गतवर्षीच्या महापुरात गावाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. जनावरे महापुरात वाहून गेल्याने ग्रामस्थांचे कंबरडेच मोडले. 2019 चा महापूर हा 1989, 2005 च्या तुलनेत महाभयानक होता. त्याचा अनुभव घेता, पन्नासहून अधिक कुटुंबांनी सोनतळीकडे विस्थापित होण्यासाठी 2019 च्या दिवाळीनंतर पावले उचलली. सोनतळीत चिखलीचे पुनर्वसन केले आहे. तेथे ग्रामस्थांची घरे उभी राहत आहेत. 
पावसाळ्याच्या तोंडावर चिखली ग्रामपंचायतीने जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची वाट न पाहता चिखलीतील ग्रामस्थांनी कुळांना घर सोडण्यास सांगितले आहे. तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसाठी सोनतळीत छावण्या मारण्याचे नियोजनही केले आहे. 
बावीस वर्षांपूर्वी चिखलीतून सोनतळीचे रहिवासी झालेले अनिल पाटील म्हणाले, ""आम्ही 1997 ला सोनतळीत घर बांधले. त्यामुळे 2005 व 2019 मध्ये आमचे नुकसान काही झाले नाही. उलट, गावकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर राहतो. आता सर्वांनीच पुराचा धोका टाळण्यासाठी सोनतळीत येण्याची गरज आहे.'' 
माध्यमिक आश्रमशाळा व महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आनंदा वाघमोडे म्हणाले, ""सोनतळीच्या परिसरात शाळा, तलाव व येथून चार किलोमीटर अंतरावर भुयेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. ग्रामस्थांसाठी मूलभूत गरजा उपलब्ध आहेत.'' 

* प्रयाग चिखली (ता. करवीर) 
* लोकसंख्या - सुमारे 8500 
* घरे- 1000 
* जनावरे - 500 


जागा वाटपचा तिढा 
चिखली व आंबेवाडीला 1989 ला महापुराने तडाखा दिला. शासनाने तातडीने 1990 ला त्यांच्या विस्थापनासाठी सोनतळीत 1340 प्लॉट पाडले. त्यातील काही जागांवर ग्रामस्थ विस्थापित झाले. पुन्हा 1994 ला 225 गरजूंसाठी जागा देण्यात आल्या. कुटुंबप्रमुखाच्या नावावर जागा देण्याचा निकष आहे. कुटुंबाचा विस्तार वाढल्याने जागा नेमकी द्यायची कोणाला, असा तिढा आहे. 

लोकसंख्येच्या मानाने सोनतळीत जागा उपलब्ध नाहीत. प्रॉपर्टी कार्ड मिळत नसल्याने बॅंका कर्ज देत नाहीत. जागांचे रेकॉर्ड तहसीलदार, प्रांत कार्यालयाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे शिल्लक जागेचे फेरसर्वेक्षण होणे आवश्‍यक आहे. 
- एस. आर. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT