NCP Ajit Pawar Esakal
कोल्हापूर

Independence Day : मला नेहमीच कोल्हापूरकरांचा अभिमान वाटत राहिलाय; असं का म्हणाले अजितदादा?

मला नेहमीच कोल्हापूरकरांचा अभिमान वाटत राहिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीकविमा योजना सुरु केली आहे. जगाच्या इतिहासात अशी योजना कोणीही सुरु केली नव्हती.

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते कोल्हापुरात नुकतेच पार पडले.

यावेळी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस बरा असला तरी, पिकांना जेवढा पाऊस हवा होता, तेवढा मिळाला नाही. आज देखील आपल्या राज्यातील काही भागात टॅंकर सुरु करावे लागताहेत.

माझा शेतकरी, कष्टकरी वाचला पाहिजे म्हणून सरकार सातत्यानं लक्ष ठेवून आहे. कांदा उत्पादकांसाठी सरकारनं साडेपाचशे कोटी मंजूर केले आहेत. शिवाय, शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीकविमा योजना सुरु केली आहे. जगाच्या इतिहासात अशी योजना कोणीही सुरु केली नव्हती, ती योजना आपण आपल्या राज्यात सुरु केली आहे.

मला नेहमीच कोल्हापूरकरांचा अभिमान वाटत राहिला आहे. मी ज्यावेळी ऊर्जामंत्री होतो, त्यावेळी सगळ्यात चांगल्या पध्दतीनं विजेचा पैसा देणारी सर्वसामान्य जनता कुठली असेल तर ती म्हणजे, कोल्हापूरची. वेळेत परत फेड करणारी लोक इथं आहेत. अतिशय चांगल्या पध्दतीनं योजनांचा वापर करणारी लोक माझ्या कोल्हापुरात आहेत. त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचे अजितदादांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT