Farmer loan sakal
कोल्हापूर

पावणेदोन लाख शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार?; शासनाची 'अनुदाना'ची घोषणा हवेतच!

सुनील पाटील

कोल्हापूर : शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना(farmers)तीन लाखांपर्यंतच्या पीककर्जावर व्याज माफी जाहीर केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे; पण प्रामाणिकपणे पीककर्ज परतफेड (interest waiver on crop loan) करणाऱ्या जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या प्रोत्साहनात्मक रकमेचे पन्नास हजार रुपये अनुदान दोन वर्षांपासून दिलेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय आतातरी मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. (interest-waiver-on-crop-loan-scheme-flopped-kolhapur-district-farmers-marathi-news)

राज्य शासनाने २ लाख रुपयांपर्यंतची थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली. यामध्ये प्रामाणिकपणे पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. जाहीर केल्यानंतर एक ते दोन महिन्यांत ही रक्कम मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, वर्ष होऊन गेले तरीही शेतकऱ्यांच्या पदारात ही रक्कम पडलेली नाही. वास्तविक, जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली आहे.

प्रत्येक वर्षी ९० टक्क्यांपेक्षा जास्त कर्ज वसुली केली जाते. साखर कारखान्यांना ऊस गेल्यानंतर थेट कारखान्याकडूनच कर्जाचे हप्ते वसूल केले जातात. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कर्ज वसुली सर्वाधिक आहे. थकीत कर्जदारांना कर्जमाफी मिळाली, तर प्रामाणिक शेतकऱ्यांकडूनही कर्ज थकीत ठेवण्याचे प्रमाण वाढू नये, यासाठी प्रोत्साहनात्मक योजना सुरू केली; पण याचीही आता प्रतीक्षा करावी लागत आहे.

प्रामाणिक जास्त, थकीत कर्जदार कमी

जिल्ह्यातील ४२ हजार ९९० थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. यामध्ये जिल्हा बॅंकेच्या २९ हजार ४९१, तर राष्ट्रीयीकृत व इतर बॅंकांच्या १३ हजार ४२२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या सर्व शेतकऱ्यांना ३७२ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली; पण प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक रकमेची वाट पाहावी लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

सोनी BBC अर्थने धर्मेश बरई यांचा ‘अर्थ चॅम्पियन’ म्हणून गौरव केला

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT