कोल्हापूर

राजू शेट्टींच्या टिकेला जयंत पाटलांच प्रत्युत्तर

बलराज पवार

सांगली : पंचगंगेचे पुराचे पाणी टनेलने कर्नाटकात सोडले तर कोल्हापूर, शिरोळ आणि इचलकरंजीचे पुराचे संकट टाळता येईल. मात्र राजू शेट्टींना हे नको असेल तर नाईलाज आहे. हा प्रकल्प रद्द करतो असा इशारा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी, पंचगंगेचे पुराचे पाणी राजापूर बंधाऱ्याच्या पलीकडे कर्नाटकात सोडण्याच्या प्रकल्पावर टीका करताना राष्ट्रवादीला, जयंत पाटलांना असे मोठे प्रकल्प काढायची सवय आहे, असे वक्तव्य केले होते.

सांगलीत पत्रकारांशी बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी याचा समाचार घेतला. ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगेचे पावसाचे पाणी कुठे न्यायचे हा प्रश्न पडतो. ते बाहेर जात नसल्यामुळे कोल्हापूर, इचलकरंजी आणि शिरोळ तालुका कायम पुराच्या संकटात आहे. हे पाणी टनेलने राजापूर बंधाऱ्याच्या पलीकडे टाकले, तर पाण्याची उंची कमी करता येईल. पुराचे संकट टाळता येईल. पण हे जर शेट्टींना नको असेल तर नाईलाज आहे. हा प्रकल्प रद्द करतो.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, राजू शेट्टी यांनी हवेत आरोप करणे योग्य नाही. मोर्चात काहीही बोलणे त्यांनी टाळले पाहिजे. आमचा त्यांच्यावर राग नाही. पंचगंगेचे पाणी राजापूर बंधाराच्या पलीकडे टाकले तर, म्हणजे जवळपास 30 ते 40 टक्के पाणी वळवले तर शिरोळ, इचलकरंजी शहरातील पाण्याची उंची कमी होईल असा प्रयत्न आहे त्याचा अभ्यास चालू आहे निष्कर्ष काढलेला नाही. जर निष्कर्षापर्यंत तथ्य वाटले तर त्याला पूर्ण स्वरूप देता येईल. पण सुरुवातीलाच शेट्टींचा त्याला विरोध असेल तर नाईलाज आहे. पूर टाळण्यासाठी काही मोठ्या महत्वकांशी योजना हाती घेतल्याशिवाय कोल्हापूर जिल्ह्याला पर्याय नाही. त्यामुळे सांगलीपासून सगळी लोकसंख्या जी या पुराच्या पट्ट्यात आहे, त्यांच्यासाठी पाणी बाहेर कसे काढायचे? ही मोठी समस्या असते. त्याच्यावर उत्तर शोधण्यासाठी आम्ही काम करतोय.

सांगलीत पत्रकारांशी बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी याचा समाचार घेतला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काढलेल्या शेतकरी मोर्चा बद्दल बोलताना मंत्री श्री. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या मोर्चातील मुद्दे लक्षात घेतले आहेत. त्यात कोणतीही अडचण नाही. शेतकऱ्यांना जादा मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे मोर्चे काढणे, पंचगंगेची परिभ्रमण यात्रा काढण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत योग्य निर्णय सरकारने घेतलेत असे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT