आमदार सतेज पाटील
आमदार सतेज पाटील sakal
कोल्हापूर

Kolhapur : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लुटणाऱ्यांना धडा शिकवूया

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचाच राहावा, त्याचे खासगीकरण होऊ नये यासाठी ही लढाई आहे. गेली २८ वर्षे कारखाना लुटणाऱ्यांना धडा शिकवून सभासदांना आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे.

सत्ताधाऱ्यांनी आमच्या उमेदवारांना अपात्र ठरविण्यासह कितीही कारस्थाने रचली तरी स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने ही लढाई आपण नक्की जिंकणार,’ असा विश्‍वास विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे प्रमुख आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

राजाराम साखर कारखाना निवडणुकीसाठी छत्रपती राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ कसबा बावडा येथील हनुमान मंदिरात आमदार पाटील, आमदार ऋतुराज पाटील,निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते साध्या पद्धतीने करण्यात आला. यावेळी श्री. पाटील बोलत होते. उमेदवारांची यादी जाहीर करून लवकरच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी उपस्थितांकडून ''आमचं ठरलंय, कंडका पाडायचा'' अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. पाटील गल्ली येथून या प्रचार फेरीला सुरुवात झाली. प्रमुख मार्गावरून आंबे गल्लीमार्गे पुन्हा हनुमान मंदिर येथे प्रचार फेरीची सांगता झाली. या प्रचार फेरीत कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने,

बाबासाहेब चौगले, बी.एच. पाटील, उदयानी साळुंखे, विजयमाला नेजदार, शशिकांत खोत, एस आर पाटील (चिखली), मोहन सालपे, डॉ. संदीप नेजदार, हिंदुराव ठोंबरे, मधुकर चव्हाण, उत्तम सावंत, सचिन चौगले (वडणगे), किरण भोसले, बाबूराव बेनाडे, विठ्ठल माने, धनाजी चौगुले, अण्णा रामांना, निर्मला पाटील यांच्यासह बावड्यातील श्रीराम सोसायटीचे संचालक, माजी नगरसेवक व १२२ गावांतील कार्यकर्ते सहभगी झाले होते.

महाडिकांनी केवळ स्वार्थ साधला ः सर्जेराव माने

कोल्हापूर ः ‘राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलच्या प्रमुख उमेदवारांना अपात्र ठरविण्याचे कारस्थान म्हणजे मैदान सोडून पळ काढण्याचा प्रकार आहे. समोर पराभव दिसत असल्याने कुस्ती लागण्याअगोदरच महाडिक लंगोट टाकून मैदानातून पळाले आहेत,’ अशी टीका माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी केला.

राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या प्रचारार्थ नरंदे, आळते येथे झालेल्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, की गेली २८ वर्षे कारखानाची सत्ता भोगणाऱ्या महाडिकांनी आजपर्यंत केवळ स्वत:चा स्वार्थ साधला. सभासद हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाडिक यांच्या या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या सभासदांनी परिवर्तनाचा ठाम निर्णय घेतला आहे. या वेळी आमदार राजूबाबा आवळे यांचेही भाषण झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT