Kolhapur municipal  sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : घरफाळा पाणीपट्टीकडे नागरिकांची पाठ

कोरोनामुळे महापालिका प्रशासनासमोर आर्थिक समस्या निर्माण झाल्या.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: महापालिका प्रशासन मार्चमध्ये घरफाळा आणि पाणीपट्टीच्या वसुलीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करते. नागरिकही थकलेला घरफाळा आणि पाणीपट्टी भरण्यासाठी रांगा लावतात, मात्र यंदा मार्च महिना आला तरी पाणीपट्टीची वसुली ५० टक्केच आहे, तर घरफाळाच्या थकबाकीतील रक्कमही जेमतेमच जमा झाली आहे. याचा परिणाम महापालिकेच्या पुढील ताळेबंदावर होणार आहे.

कोरोनामुळे महापालिका प्रशासनासमोर आर्थिक समस्या निर्माण झाल्या. काही वेळा कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन देणे अशक्य झाले. कोरोना महापुरामुळे नागरिकांना घरफाळा, पाणीपट्टीबाबत सक्ती करता येत नव्हती. यावर्षी नागरिकांनी घरफाळा, पाणीपट्टीकडे पाठ फिरवली आहे. मार्चअखेरपर्यंत यातील किती रक्कम वसूल होणार याबाबत प्रश्नचिन्हच आहे. ही वसुली पूर्ण झाली नाही तर पुढील आर्थिक वर्षात महापालिकेला मोठ्या आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागेल. यावर्षी रंकाळा सुशोभीकरणासाठी जो निधी मिळाला, त्यामध्ये २५ टक्के रक्कम महापालिकेने द्यायची होती, मात्र महापालिकेला ही रक्कम भरता न आल्याने अन्य पर्यायातून या रकमेची व्यवस्था केली होती. महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत करण्यातही अडचणी आल्या होत्या. त्यामुळे यंदा घरफाळा आणि पाणीपट्टी शंभर टक्के वसूल करणे क्रमप्राप्तच आहे; पण सध्यातरी थकीत बिले भरण्याचे प्रमाण कमी आहे. पाण्याची थकबाकी सुमारे ३५ कोटी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT