In Kolhapur district, 15 thousand cripples are waiting for 35 kg ration 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात 15 हजार दिव्यांगांना 35 किलो रेशनची प्रतीक्षाच

शिवाजी यादव

कोल्हापूर ः कोरोनाकाळात अनेकांचे जगणे कठीण झाले. अशात दिव्यांग व्यक्तीच्या जगण्याचे प्रश्‍न गंभीर होऊ शकतात ही बाब विचारात घेऊन केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजने अंर्तगत रेशन धान्य देण्याचे आदेश आहेत. मात्र विविध तांत्रिक अडचणीत या आदेशाची अंमलबजावणी क्षमतेने झालेली नाही, परिणामी जिल्ह्यातील 15 हजार दिव्यांगाच्या तोंडचा घास हिरावला आहे. 
कोरोना लॉकडाऊन काळात उद्योग, व्यवसाय बंद झाले. अर्थकरण बिघडले त्यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर व्यवसाय बंद झाल्याने अर्थिक उलाढाल थंडावली . या साऱ्यात दिव्यांगाच्या जगण्यालाही मोठा फटका बसला आहे. अशा दिव्यांग घटकाला आधार देण्यासाठी केंद्र सरकारने रेशनवर धान्य देण्याचा आदेश काढला. 
या आदेशानुसार जिल्ह्यातील दिव्यांगाना अंत्योदय योजनेत रेशनकार्ड देऊन त्यांना 35 किलो प्रमाणे धान्य द्यावे, अशी मागणी प्रहार संघटनेने केली. जिल्ह्यात जवळपास 26 हजार दिव्यांग व्यक्ती आहेत. यातील किमान 15 हजार दिव्यांग व्यक्ती विवाहित आहे. त्यांना नव्या आदेशाच्या नुसार अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड व धान्य मिळावे, अशी अपेक्षा आहे. 
पुरवठा अधिकाऱ्यांनी ज्या दिव्यांग व्यक्तीचे रेशन कार्ड नाही, अशांच्या नावांची यादी रेशन दुकानदारांकडून मागवली आहे. त्यानुसार अनेक दिव्यांग व्यक्ती रेशन दुकानात धान्य मागतात. तेव्हा तुमचे रेशनकार्ड केसरी रंगाचे आहे. तुम्ही ज्या कुटूंबात आहात त्या कुंटूंबाला जितके धान्य मिळते. तेवढेच मिळणार असे सांगत आहेत. नवे रेशन कार्ड देण्याच्या सुचना नाहीत, असे सांगितले जात आहे. यातून दिव्यांग व्यक्ती व रेशन दुकानदार यांच्यात वादाचे प्रसंग होतात. 
अन्य जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तीना 35 किलो प्रमाणे धान्य वाटप सुरू झाले आहे. मात्र कोल्हापूर तसे झालेले नाही, अन्य दिव्यांग विवाहित व्यक्ती स्वतंत्र रहातात पण त्यांचे नाव जुन्या रेशन कार्डात एकत्र कुटूंबाच्या रेशनकार्डात आहे. अशांना त्याचा लाभ मिळत नाही तर एकत्र कुटूंबात रहाणाऱ्या बहुतेक दिव्यांग व्यक्तीचे कार्डकेसरी आहे. त्यांना अंत्योदय प्रमाणे धान्य मिळत नाही. अशा अडचणीत दिव्यांग व्यक्ती रेशन धान्याच्या नव्या आदेशापासून वंचित आहेत. 

"" केंद्र सरकारच्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तीना दरमहा 35 किलो धान्य अंत्योदय योजनेतून देणे अपेक्षीत आहे. मात्र प्रत्यक्ष रेशन दुकानात दिव्यांगाना तेवढे धान्य दिले जात नाही. प्रहार संघटनेने आवाज उठवला आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. दिव्यांगाना अंत्योदय योजनेत धान्य देण्याची मागणी केली आहे.पाठपुरावा सुरू'' 
- देवदत्त माने, जिल्हाध्यक्ष, प्रहार संघटना 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

SCROLL FOR NEXT