kolhapur sakal
कोल्हापूर

Kolhapur : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचा, शेतकऱ्यांचा आवाज हरपला

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पीजी पाटील यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

पश्चिम महाराष्ट्राततील शेतकरी संघटनेचे संस्थापक, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पीजी पाटील ( पांडुरंग गणपती पाटील) वय ७७ रा वाकरे ता करवीर यांचे निधन झाले ,शेतकऱ्यांचा आवाज हरपला अशा भावना, शेतकरी संघटनेचे नेते व शेतकऱ्यांच्यातून व्यक्त होत आहेत.पीजी पाटील यांनी कॉलेजच्या जीवनापासून संघटनात्मक कामाला सुरुवात केली, सुरुवातीला जनता दलातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, ऊस दर ,दूध दर आंदोलनाला सुरुवात केली, यशवंत बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले आहे.

शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष धुरा सांभाळली, यानंतर रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष होते. ऊस दराचे आंदोलन त्यांनी उत्तम पद्धतीने हाताळले, उसाला सातशे रुपये दर त्यावेळी मिळत होता, तेव्हापासून तीन हजार रुपये दर मिळेपर्यंत त्यांनी आंदोलनाची धार कायम ठेवली होती.

गावात शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळावा यासाठी शेतकरी दूध संस्थेची स्थापना केली, या शेतकरी दूध संस्थेत फक्त शेतकऱ्यांचे हित जोपासले जाते, स्थापनेपासून गेली २५ वर्षे ठरावाला मूठमाती देत ,गोकुळ चे सभासदत्व नाकारणारी जिल्ह्यातील ही एकमेव दूध संस्था आहे.

उसाला दर मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलने केली ,वेळप्रसंगी तुरुंगवास भोगला आहे. खासदार राजू शेट्टी, रघुनाथ दादा पाटील, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना या संघटने बरोबर काम केले आहे.काही दिवस पीजी पाटील यांच्यावर कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते ,अल्पशा आजाराने आजचारा दरम्यान त्यांचे निधन झाले . त्यांच्या निधनाने वाकरे गावासह परिसरातील शेतकऱ्यांच्यात शोककळा पसरली आहे.

रघुनाथ दादा पाटील, शेतकरी संघटना, अध्यक्ष महाराष्ट्र ,

पीजी पाटील शेतकरी कुटुंबातील कृतीशील अभ्यासू आंदोलक व्यक्तिमत्व होते, पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले, आंदोलनाची धार गेली ४० वर्षे कायम ठेवली, त्यांच्या जाण्याने शेतकऱ्यांचे आणि शेतकरी संघटनेचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT