Radhanagari Dam Kolhapur Rain News esakal
कोल्हापूर

Radhanagari Dam : तीन तासांत राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले; पंचगंगेच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता

पावसाचा जोर कायम असून पाणी पातळी वाढल्यास आणखी दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे.

राजू पाटील

भोगावतीच्या पुरात आणखीन भर पडणार असून परिणामी उद्यापासून पंचगंगेची पाणी पातळी ही वाढण्याची शक्यता आहे.

राधानगरी : आज सकाळी साडेदहा पर्यंत राधानगरी धरणाच्या (Radhanagari Dam) स्वयंचलित सात दरवाज्या पैकी चार दरवाजे खुले झाले आहेत. यातून वीज निर्मितीसाठी 7100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सध्या सुरू झाला आहे.

पावसाचा जोर कायम असून पाणी पातळी वाढल्यास आणखी दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. कालपासून या धरणाच्या स्वयंचलित दरवाजाबाबत सोशल मीडियावरून अफवांचे पेव फुटले होते.

इंचा इंचाने पाणी वाढत असतानाच आधीच पंचगंगा आणि भोगावती नदीला आलेल्या पुराची तीव्रता आणखीन वाढण्याची भीती लोकांमध्ये जागृत झाली होती. दुसरीकडे हे धरण भरलेच पाहिजे हेही मत असताना आज रात्री केव्हाही स्वयंचलित दरवाजे खुले होतील, असा लोकांचा अंदाज होता.

मात्र, आज सकाळी आठ वाजता स्वयंचलित दरवाजांनी हा मुहूर्त साधला. वाऱ्याचा प्रचंड दाब असल्याने क्षमतेपूर्वीच सात पैकी सहा क्रमांकचा दरवाजा खुला झाला. त्यानंतर दोन तासात आणखी तीन दरवाजे खुले झाले. सध्या तीन ते सहा असे सलग दरवाजे खुले आहेत. यामुळे भोगावतीच्या पुरात आणखीन भर पडणार असून परिणामी उद्यापासून पंचगंगेची पाणी पातळी ही वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News : दिवाळीसाठी फटाके आणायला गेले, ते पुन्हा परतलेच नाहीत; ट्रकच्या धडकेत बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू...

धक्कादायक! तरुणाने ग्लासात फटाका पेटवला, तेवढ्यातच मोठा स्फोट झाला अन्...; नेमकं काय घडलं?

Air Pollution : तंबाखूपेक्षा जास्त मृत्यू वायू प्रदुषणामुळे! भारता रोज ५७०० लोक गमावायेत जीव, धक्कादायक अहवाल समोर...

Jalna News : अंबड-घनसावंगी तालुक्यातील 252 गावासाठी 139 पोलिस पाटील पदासाठी पात्र; 26 गावाना मिळाल्या पोलिस पाटील

दिवाळीत गोड खाण्यावर ठेवा नियंत्रण! शरिरावरील दुष्‍परिणाम टाळण्यासाठी आहारतज्‍ज्ञांचा सल्‍ला

SCROLL FOR NEXT