चौथ्यांदा वाहतुकीस बंद झाला. sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : रेल्वेमार्गावरील मोरी बंद

वळिवडे येथे महापुरात रेल्वेमार्ग बंद होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

गांधीनगर : वळिवडे ते रुकडी रेल्वे मार्गादरम्यान ओढ्याच्या प्रवाहासाठी असलेली मोरी बंद केल्याने परिसरातील रहिवाशांना महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे रुळावर पाणी येऊन रेल्वे वाहतूक बंद होण्याचाही धोका आहे. येथे मोरी पूर्ववत करण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने येथील मोऱ्या रिकाम्या कराव्यात, अन्यथा त्यासाठी आंदोलन करावे लागेल, असाही इशारा स्थानिकांनी दिला आहे.

१८९४ पासून वळिवडे-रुकडी रेल्वेमार्गावर चिंचवाड (ता. करवीर) येथील गेट क्रमांक २३ च्या पश्चिमेला सहा फूट उंचीची दगडी मोरी बांधलेली होती. दरवर्षी या मोरीतून नैसर्गिक ओढ्याचे पाणी वाहून पुढे नदीला मिसळत होते. सहा ते सात वर्षांपूर्वी ही मोरी मोडकळीस आलेली पाहून रेल्वे खात्याने ही मोरी बंद करून टाकली. मोरीतून वाहून जाणारे पाणी साचून राहून परिसरातील शेतजमिनींत थांबू लागले. दरवर्षी हे पाणी थांबू लागल्याने या परिसरातील सुमारे सव्वाशे ते दीडशे एकर शेतजमिनी क्षारपड होऊ लागली. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरात ही मोरी ओढ्याच्या पाण्याच्या वेगाने तुटून निघाली. याठिकाणची रेल्वे रुळाखालची भर वाहून गेली आणि पूल लोंबकळू लागले.

रेल्वे खाते आणि जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून या ठिकाणी मोरी बांधणे गरजेचे असताना रेल्वे खात्याने हा भराव काँक्रिटच्या भिंती आणि भर घालून भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. ओढ्याचे पाणी कदाचित थांबले किंवा मार्ग बदलेल; दरम्यान, रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

रेल्वे खात्याने जुनी मोरी बंद करून येथील भराव भक्कम करून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद केला आहे. यामुळे दरवर्षी याठिकाणी पाणी साठून येथील पिकांचे नुकसान होऊन जमिनी क्षारपड होण्याचा धोका वाढेल.

- सिद्धोजीराव रणवरे, शेतकरी, चिंचवाड

या ठिकाणी असणारी मोरी पुन्हा बांधून नैसर्गिक प्रवाहाला वाट करून देणे गरजेचे आहे. भविष्यात पाऊस आणि महापुराचा फटका बसला तर वळिवडेला याचा धोका निर्माण होईल.

- अनिल पंढरे, सरपंच, वळिवडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT