पाणी पाच दिवस राहणार बंद
पाणी पाच दिवस राहणार बंद sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : जरगनगर परिसराचे पाणी पाच दिवस राहणार बंद

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : निर्माण चौकातील पंपात झालेला बिघाड दूर झाला नसल्याने जरगनगर परिसरातील नागरिकांना आणखी पाच दिवस पाणीपुरवठा होणार नाही. तीन दिवसांपासून पंप बंद असून, दुरुस्ती झालेली नाही. यामुळे ऐन उन्हाळ्यात जरगनगर परिसरात टॅंकरद्वारे पाणी दिले जात असून, नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. पाण्याच्या खासगी टॅंकरची मागणी वाढली असून, त्यांनी दर वाढविले आहेत.

शिंगणापूर योजनेतील पुईखडी ते राजारामपुरीकडे जाणाऱ्या ११०० मिलिमीटर व्यासाच्या गुरुत्वनलिकेवरून निर्माण चौक येथून जरगनगर व संलग्नित परिसराला पंपिंगने पाणीपुरवठा केला जातो. या पंपात मंगळवारी (ता. २६)पासून बिघाड झाला. जरगनगर व संलग्नित परिसराचा पाणीपुरवठा बंद आहे. पंप १२ वर्षे जुना असल्याने पंपाची दुरुस्ती करणारे मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे दुरुस्तीला आणखी पाच दिवस लागणार आहेत. जरगनगर व परिसर उंचावर आहे. तिथे मुळात रोज योग्य दाबाने पाणी येण्यासाठी झगडा करावा लागत होता. आता तर पाणीच नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. या भागात कळंबा फिल्टर येथून टँकरद्वारे पाणी दिले जाते. महापालिकेच्या टॅंकरमधून बादली वा कळशीद्वारे पाणी भरावे लागत असल्याने नागरिकांना रोज टॅंकरमधून पाणी भरण्याचा त्रास होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

SCROLL FOR NEXT