कोल्हापूर - कोरोना चा प्रभाव कमी असलेल्या क्षेत्रात कृषी,कृषी पूरक वैद्यकीय साहित्य व अन्य उद्योग काही नियमांच्या अटीवर सुरू करण्यास परवानगी देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह असून कोरोना महामारी चा मूकाबला करण्या बरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेला थोड्याफार प्रमाणात सावरण्यास या निर्णयाची मदत होईल, असे मत फिक्की या राष्ट्रीय शिखर संस्थेचे एक्झिक्यूटिव्ह समिती सदस्य व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्तरावर देशभरातील सगळ्या व्यापार-उद्योग संघटनांचे मत विचारात घेऊन देशातील व्यापार उद्योग क्षेत्राची शिखर संस्था असलेल्या फिक्की व असोचेम या दोन्ही शिखर संस्थांनी देशातील उद्योग धंदे अंशतः सुरू करण्याची आग्रही मागणी केंद्र सरकारकडे केली होती.स्थानिक स्तरावर सुद्धा विविध संघटनांनी याविषयी सरकारकडे आपली मागणी नोंदवली होती.
मालाची वाहतूक करण्यासाठी परवानगी
या सर्व सूचनांचा विचार करून केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने आज मार्गदर्शक सूचना व आदेश जारी केले आहेत. त्या आधारे 20 एप्रिलपासून राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्राच्या बाहेरील उद्योग धंदे सुरू करता येतील, त्याचबरोबर कृषी व कृषिपूरक व्यवसाय, फार्मासिटिकल क्षेत्रातील कंपन्या, आयटी क्षेत्रातील कंपन्या या सर्वांना आपले व्यापार उद्योग सुरू करता येणार आहेत, तसेच कच्च्या मालाचा पुरवठा, सर्व प्रकारच्या मालाची वाहतूक करण्यासाठी सुद्धा ही काही अटीवर परवानगी देण्यात आलेली आहे.
केंद्र सरकारचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असून, लोक डाउन मुळे ठप्प पडलेल्या अर्थव्यवस्थेला काही प्रमाणामध्ये चालना देण्यासाठी या निर्णयाची मदत होणार असून देशाचा जीडीपी 0 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची व्यक्त केलेली भीती निराधार ठरविण्यासाठी या निर्णयाचा नक्कीच उपयोग होईल,असे मत ही ललित गांधी यांनी व्यक्त केले.
सकाळची भुमिका महत्वाची
दैनिक सकाळने याविषयी घेतलेली भूमिका,केलेले विश्लेषण याचाही निर्णय होण्यामध्ये मोलाचा वाटा असून, दैनिक सकाळच्या भूमिकेचा सकारात्मक परिणाम या निर्णयाच्या माध्यमातून दिसून आला आहे असेही गांधी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.