Mahatma Phule Farmers Debt Relief Scheme esakal
कोल्हापूर

कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेतील एक लाख 88 हजार शेतकऱ्यांना मिळाला 686 कोटींवर लाभ; 14 लाख मात्र गेले परत

Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme : आतापर्यंत एक लाख ८८ हजार ५४६ शेतकऱ्यांना ६८६ कोटी ४१ लाख रुपये लाभ मिळाला आहे.

कुंडलिक पाटील

प्रोत्साहन अनुदान योजनेमध्ये जिल्हा बँकेतील ५३ शेतकऱ्यांची (Farmers) बँक खाती बंद असल्यामुळे १४ लाख रुपये राज्य शासनाला परत गेले आहेत.

कुडित्रे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेमधील (Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme) ५३ शेतकऱ्यांचे बँक खाते बंद असल्यामुळे १४ लाख रुपये परत गेले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांमधील पात्र असून अपात्र झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्‍न जैसे थे आहे. तीन वर्षा पैकी एक वर्ष पीक कर्ज उचल केलेल्या आणि प्रामाणिकपणे कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे.

आतापर्यंत एक लाख ८८ हजार ५४६ शेतकऱ्यांना ६८६ कोटी ४१ लाख रुपये लाभ मिळाला आहे. प्रोत्साहन अनुदान योजनेमध्ये जिल्हा बँकेतील ५३ शेतकऱ्यांची (Farmers) बँक खाती बंद असल्यामुळे १४ लाख रुपये राज्य शासनाला परत गेले आहेत. अनेक शेतकऱ्यांचा बँकेत व्यवहार शून्य असतो. या शेतकऱ्यांनी आपली बँक खाती सुरू करून घ्यावी लागणार आहेत. या शेतकऱ्यांची यादी सहकार उपनिबंधक खात्याने पुन्हा शासनाला कळवली आहे. बँक खात्याला आधार लिंक नसलेले सुमारे पंधराशे लाभार्थी होते. यापैकी ११०० लाभार्थी मयत होते. या शेतकऱ्यांचा जुना डाटा रद्द करण्यात आला आहे.

तसेच वारसांचा डेटा अपलोड करण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच तीन वर्षांपैकी एक वर्ष पीक कर्ज उचल केलेले आणि अपात्र झालेले सुमारे आठ हजार लाभार्थी आहेत. जिल्ह्यातील ५५० शेतकरी लाभार्थ्यांच्या नावामध्ये बदल होता. यामध्ये कर्ज एका शेतकऱ्याचे आणि नाव पत्नी किंवा मुलग्याचे अशा पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा डाटा दुरुस्त केला जाणार असून या शेतकऱ्यांचे आधार प्रामाणीकरण पूर्ण झाले आहे.

सुमारे ३३ हजार लाभार्थी अपात्र आहेत. यामध्ये शासकीय नोकर व टॅक्स भरणारे शेतकरी सोडल्यास सुमारे सहा ते आठ हजार शेतकरी राष्ट्रीयीकृत बँकांचे पीक कर्जदार आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये मार्चला खाते भागवून घेऊन पुढच्या आर्थिक वर्षात पीक कर्ज दिले जाते. यामुळे एका आर्थिक वर्ष दोन वेळा पीक कर्ज केलेला नियम या बँकांना लागू होत नाही. अशा पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी राज्यपातळीवर हा नियम बदलावा व न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे. एक रुपया टॅक्स गेल्यामुळे अपात्र झालेले शेतकऱ्यांचेही प्रश्‍न जैसे थे आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६८६ कोटी ४१ लाख रुपये आजवर मिळाले आहेत.

मयत शेतकऱ्यांचा डेटा रद्द करून वारसांचा डेटा अपलोड करण्याचे काम सुरू आहे. बँक खाते बंद असल्यामुळे पैसे परत गेलेल्या शेतकऱ्यांची यादी पुन्हा कळविली आहे. नावात बदल असलेल्या शेतकऱ्यांची दुरुस्ती केली जाणार आहे.

-नीलकंठ करे, सहकार उपनिबंधक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघर साधू हत्याकांडाचे आधी आरोप केले, आता पक्षात का घेतलं? CM फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, भाजपकडून प्रवेशाला स्थगिती

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

CM Devendra Fadnavis: मित्रपक्षांना शत्रू समजू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला, युती म्हणून एकत्र लढणार

Kolhapur News: कुरुंदवाडच्या रणांगणात कलाटणी! ठाकरे गट शाहू आघाडीसोबत; काँग्रेस ‘एकाकी’

Video Viral: वाहत्या पुरात हरीणाला हत्तीनं दिलं जीवनदान, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT