marriage permission is compulsory in belgaum from 1 december rules and regulations also follow by party 
कोल्हापूर

आधी परवानगी घ्या, मगच ‘शुभमंगल’ म्हणा ! ; प्रशासनाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव (निपाणी) : कोरोनामुळे शासनाने लग्न समारंभासाठी ५० वऱ्हाडींची अट घातली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिका आणि जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून मास्क वापरले नाही तर कार्यालयच सील करण्याचा इशारा दिला होता. लग्न कार्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलिसांची परवानगी बंधनकारक आहे. विनापरवानगी सोहळा घेतल्यास थेट गुन्हे दाखल केले जातील.

जानेवारी, फेब्रुवारीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने स्थानिक प्रशासनाला आवश्‍यक उपाययोजनांचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लग्नकार्यासंदर्भात आदेश काढले असून हे आदेश एक डिसेंबरपासून लागू होतील. आदेशानुसार खासगी आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी बंदी कायम ठेवली आहे. लग्नासाठी पन्नास व्यक्तींची मर्यादा आहे.

संबंधितांना पालिका आणि पोलिसांची परवानगी लागेल. समारंभात सहभागी होणाऱ्याला मास्क वापरणे बंधनकारक आहे. तसेच सुरक्षित वावर, सॅनिटायझरचा वापर करावा लागेल. सोहळ्यात विनामास्क आढळले तर मंगल कार्यालय चालकाला पहिल्यांदा पाचशे रुपयांचा दंड होईल. त्यानंतर असाच प्रकार घडला तर मंगल कार्यालय सात दिवसांसाठी सील केले जाईल. नंतर थेट गुन्हा दाखल होणार आहे.
 

वाजंत्री नाहीच

विवाह सोहळ्यांना नियम व अटी घालून परवानगी दिली असली तरी फटाके आणि वाजंत्र्यांना अजूनही परवानगी नाही. त्यामुळे बहु गलबला न होताच शुभमंगल सावधान म्हणावे लागणार आहे.

"नियम व अटी पाळून विवाह सोहळ्यांना परवानगी मिळेल. पालिका आणि पोलिस प्रशासनाकडे संबंधित कुटुंब प्रमुखांनी परवानगी घेणे आवश्‍यक आहे. अन्यथा कारवाई होईल."

- प्रकाश गायकवाड, तहसीलदार, निपाणी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आज काँग्रेस करणार महात्मा गांधीच्या पुतळ्याचे रक्षण

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT