कोल्हापूर

Video - कष्टाच्या कामाने आयुष्य बनविले सुंदर

माथाडी-हमालांना टनभर पोती भरल्यावर हातात साडेतीनशे मजुरी

संदीप खांडेकर

कोल्हापूर : पाठीवर 50 किलोचं पोतं उचलणं अवघड काम. एक टन पोती ट्रकमध्ये भरल्यानंतर हातावर साडेतीनशे रुपये मजुरी मिळते. ही रोजची माथाडी-हमाल कामगारांची कामाची स्थिती. संचारबंदीचा फारसा बाऊ न करता यांचं काम सुरू आहे. शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, करवीर तालुक्‍यातले हे कामगार मार्केट यार्डातच तळ ठोकून आहेत. अडत दुकानांच्या परिसरात त्यांची रात्री जेवण बनविण्याची लगबग सुरू होते आणि रात्रीच्या गप्पांत त्यांचा दिवसभराच्या कामाचा ताण हलका होतो.

माथाडी कामगारांच्या वर्षानुवर्षांच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्यासाठी कामगार एकत्र येतातही. आज ना उद्या त्या सुटतील, ही त्यांची भाबडी आशा; पण त्याच्या जास्त खोलात न जाता त्यांचं रोजचं जगणं सुरू आहे. संचारबंदीतही त्यांच्या कपाळाला आठ्या पडताना दिसत नाहीत. अडत मालकाने बोलवायचा अवकाश; त्याच्या दुकानासमोर थांबलेल्या ट्रकमध्ये भराभरा ते माल चढवतात, तितक्‍याच वेगाने उतरवतात.

पाच दिवस संचारबंदी सुरू असली तरी या काळातले हे चित्र आजही कायम आहे. डोक्‍यावर चुंबळ, पाठीवर रुमाल व हातात टोच्या घेऊन ते दुकानांत काम करतात. यातील काही कामगार गावाहून ये-जा करणारे तर काही येथे मुक्कामालाच आहेत. कोल्हापूर माथाडी आणि जनरल कामगार युनियनमध्ये यांची नोंद साडेतीन हजारांवर आहे. कांदा, बटाटा, गूळ, भाजीपाला, धान्य दुकानात त्यांचे काम चालते. 20 ते 25 वर्षे याच व्यवसायात असणारे अनेक कामगार येथे आहेत. ट्रकमध्ये माल कधी भरावा लागेल व कधी उतरवावा लागेल, याच्या वेळा निश्‍चित नाहीत. त्यामुळे सकाळी आठला सुरू झालेले काम रात्री नऊपर्यंत सुरूच असते. टाइम टेबलमध्ये काम करण्याची सवय कामगारांना राहिलेली नाही. दुपारी जेवण झाल्यानंतर तासभर अंग जमिनीवर टेकायचे.

पुन्हा कपभर चहा पोटात ढकलायचा आणि कामाला जायचे. सायंकाळी सूर्य मावळतीला लागला असताना यांच्या पाठीवर पोत्यांच्या राशीच्या राशी वाहून नेण्याचे काम सुरू असते. एक कामगार दिवसभरात किमान शंभर पोती उचलण्याचे काम करतो, असे महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल कामगार युनियनचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आकाराम केसरे सांगतात. कामगारांना भलेही कमी मजुरी मिळते; मात्र शासकीय नियमांचे पालन करण्यास ते चुकत नाहीत. तोंडाला मास्क लावतात. पोती उचलताना श्वास घेण्यात अडथळा येत असल्याने त्यांना तो नाकावरून खाली घ्यावा लागतो, असेही ते स्पष्ट करतात.

"कोरोनामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. साऱ्या जगभरच कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे आपण का थांबायचे, हा प्रश्न आहे. काम असेल त्यावेळी करायचे, नसेल त्यावेळी आनंदाने जगायचे, हे शिकले पाहिजे. एखादी परिस्थिती कशी हाताळायची हे कळाले की, जगणे सोपे होते."

- प्रकाश लवटे, माथाडी कामगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT