MP Sambhaji Raje Chhatrapati tweet on sarthi NGO 
कोल्हापूर

कोणाच्या सांगण्यावरून 'सारथी' बंद करण्याचा घाट घातला गेला ? बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा’, संभाजीराजे पुन्हा आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :   सारथी संस्थेला बदनाम करुन त्याची  स्वायत्तता घालवण्यात आली. मात्र  आंदोलनानंतर  स्वायत्तता पुन्हा  मिळाली.   मराठा समाजाने आता शांत न राहता हा घाट  घालणाऱ्य़ा  संबधितांची चौकशीसाठी आक्रमक झाले पाहिजे असे ट्विट खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.      

याबाबत त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सारथी'ला आधी जाणीवपूर्वक बदनाम करून स्वायत्तता घालवली. हि स्वायत्तता टिकविण्यासाठी समाजाच्या वतीने आम्ही अनेक आंदोलने केली, जीवनात पहिल्यांदा 'सारथी'च्या कार्यालयासमोर रस्त्यावर बसून लाक्षणिक उपोषण केले. तसेच हा मुद्दा आजपर्यंत सातत्याने लावून धरल्यामुळे आज 'सारथी' संस्थेला स्वायत्तता देण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले गेल्याचे समजते. अजून बरेच टप्पे बाकी आहेत. सारथी बाबत निर्णय घेण्यासंबंधीचे अधिकार संचालक मंडळाला देण्यात येतील असे एका 'जी आर' द्वारे सांगण्यात आले आहे. 


मराठा समाजाने आत्ताच याबाबत समाधानी न होता, नेमकं कोणाच्या सांगण्यावरून सारथी बंद करण्याचा घाट घातला गेला? याची शहानिशा करून घेतली पाहिजे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने असलेली आणि मराठा समाजाला दिशा देणारी ही संस्था ठप्प केली गेली. विविध प्रकारचे आरोप करून तिला बदनाम केले गेले. मराठा समाजाचे अमूल्य असे एक ते दीड वर्ष अक्षरशः वाया घालवले. भ्रष्टाचार आणि तत्सम आरोप सिद्ध तरी करा किंवा जाणीवपूर्वक षडयंत्र रचणाऱ्या मंत्रालयीन अधिकाऱ्याला सस्पेंड तरी करा अशी मागणी या निमित्ताने समाजाच्या वतीने आम्ही करतो. अशी भुमिका संभाजीराजे यांनी घेतली आहे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT