mpsc exam kolhapur student 
कोल्हापूर

एमपीएससीच्या निर्णयावर विद्यार्थ्यांमधून नाराजी

मतीन शेख

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) उमेदवारांसाठी प्रवर्गानुसार कमाल संधीची मर्यादा निश्चितीचा अध्यादेश आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार, यापुढे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीतजास्त ६ वेळा, तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त ९ वेळा परीक्षा देता येईल. या निर्णयाच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. 

मराठा आरक्षणाचे भिजत घोंगडे कायम असतानाच हा मराठा उमेदवारांवर अन्याय कारक निर्णय लादला गेल्याची भावना मराठा संघटना तसेच विद्यार्थी व्यक्त करत आहेत.

मराठा समाजाचा इडब्ल्यूएसमध्ये नुकताच समावेश करण्यात आला. लढा ऊभारून आरक्षणाच्या प्रतिक्षेत असणारे अनेक मराठा उमेदवार या निर्णयामुळे अस्वस्थ झाले आहेत. रिक्त जागांची भरती डावलून राज्य आयोगाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धरतीवर कमाल संधी मर्यादेचा निर्णय जाहीर करुन खुल्या प्रवर्गाची गळचेपी केल्याचे मत या प्रवर्गातील उमेदवार नोंदवत आहेत. आरक्षण तसेच भरती प्रक्रियेचा तिढा न सोडवता अचानक हा अध्यादेश आल्याने मराठा समाजातील उमेदवार नाराज आहेत. 

सलग आठ ते दहा वर्षे उमेदवार स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुनही यशाच्या प्रतिक्षेत असतात. परंतू, आत्तापर्यंत परीक्षेच्या संधीची मर्यादा नव्हती. त्यामुळे उमेदवारांना कितीदा ही परीक्षा देता येत होती परंतू या निर्णयामुळे उमेदवारांवर परीक्षेच्या संधी बद्दल मर्यादा आल्या आहेत. हा निर्णय मागे घेवून परीक्षेच्या अमर्याद संधी ठेवाव्यात अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. तसेच काही उमेदवारांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. मर्यादीत वयापर्यंत परीक्षा देत, कमाल संधी संपताच विद्यार्थ्यांना वेगळ्या वाटा शोधता येतील यामुळे वर्षानुवर्षे परीक्षा देणाऱ्या तरुणांमध्ये येणारे नैराश्य तसेच बेकारी थांबेल असा ही मत प्रवाह व्यक्त होत आहे.

 आयोगाचा निर्णय चुकीचा व विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. प्रत्येक परीक्षेला वयाची अट असताना किती वेळा परीक्षा देता येईल? ही अट घालणे म्हणजे ओपन व ओबीसी समाजाला प्रशासकीय सेवांमध्ये येण्यास आडकाठी घातल्या सारखे आहे.

- अक्षय मांगोरे - पाटील (स्पर्धा परिक्षा उमेदवार)

  विद्यार्थ्यांना योग्य नियोजन करण्यात या निर्णयाचा फायदा होईल. योग्य तयारी न करता सतत परीक्षा देण्याची मानसिकता मागे पडेल. तसेच एका जागी निवड झाल्यानंतर ती पोस्ट सोडून परत परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना चाप बसेल. यामुळे इतर तरुणांना संधी मिळेल.
 
- दिग्विजय भोसले, (स्पर्धा परीक्षा उमेदवार) 

 यूपीएससीच्या धर्तीवर घेतलेला हा निर्णय एका एका अर्धी योग्यच आहे. नवीन उमेदवारांना स्पर्धा परीक्षेत यश नाही आले तर लवकर वेगळी वाट त्यांना निवडता येईल. अनेक वर्षे ते यात गुंतून राहणार नाहीत. करिअरचे नियोजन करण्यास याचा फायदा होईल. 

 - अक्षय शेळके ( स्पर्धा परिक्षा उमेदवार)


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT