Mumbaikars Dilemma About Back To Work Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

पोटाची काळजी करायची, की जिवाची!

अवधूत पाटील

गडहिंग्लज : कोरोनाच्या संकटाचा वेळीच अंदाज आल्याने अनेक पुणे-मुंबईकर पहिल्या टप्प्यातच गावी परतले. त्याला दोन-सव्वादोन महिन्याचा कालावधीही उलटला आहे. कोरोनाला रोखण्यात तितकेसे यश न आल्यामुळे आता त्याच्यासोबत जगण्याचा पर्याय निवडला जाऊ लागला आहे. शिवाय खासगी कंपन्याचे कामकाज टप्प्याटप्प्याने सुरू होऊ लागले आहे. त्यामुळे गावी परतलेल्यांना कामावर हजर होण्याचे निरोप येत आहेत. पण, पुणे-मुंबईकर द्विधा मनस्थितीत आहेत. रोज नवे कोरोना बाधित सापडणाऱ्या पुण्या-मुंबईत पोटासाठी जायचे की जिवाच्या भीतीने गावीच थांबायचे, हा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. 

पहिल्या टप्प्यातच कोल्हापूर जिल्ह्यात परतणाऱ्यांची संख्या 70 हजाराहून अधिक होती. याच दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउनचा निर्णय घेतला. पण, वाढत्या रुग्ण संख्येमुळे गावच सुरक्षित वाटू लागल्याने त्यातूनही अनेकांनी पुण्या-मुंबईची वेस ओलांडलीच. 
गावी येताना नोकरीचा फारसा विचार नव्हता. काही दिवसाची रजा टाकता येईल, अशी समजूत होती. कालांतराने लॉकडाउनमुळे खासगी कंपन्याचे कामकाजच थांबविल्याने तोही प्रश्‍न उरला नव्हता. मात्र, दोन महिन्याचा कालावधी उलटला तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. प्रत्येक नव्या लॉकडाउनमध्ये काही अटी घालून उद्योग-व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली जात आहे. साहजिकच पुण्या- मुंबईतही खासगी कंपन्यांचे कामकाज हळूहळू सुरू होत आहे. 

गावाकडे परतलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे निरोप येऊ लागले आहेत. स्वत: काळजी घेऊन तातडीने कामावर या असे सांगितले जात आहे. पण, रोज सापडणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. अद्यापही अनेक जण पुण्या-मुंबईवरुन गावी परतत आहे. अशा परिस्थितीत कामासाठी पुण्या-मुंबईत जायचे कसे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. त्यातून स्वत:च्या मनाची तयारी केली तरी घरातून न जाण्यासाठी कडाडून विरोध होत आहे. 

आकडे दृष्टिक्षेपात... 
- 30 मार्चपर्यंत परतलेले..... 7895 
- 30 एप्रिलपर्यंत परतलेले... 3374 
- 31 मे पर्यंत परतलेले....... 4946 

बेरोजगारीचा धोका... 
कामावर उपस्थित राहण्याचे पुणे-मुंबईकरांना निरोप येत आहेत. जर नाही गेले, तर सध्याची नोकरी गमावण्याची भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबल्यानंतर, परिस्थिती थोडी सावरल्यानंतर पुन्हा जाता येईल. पण, त्यावेळी नवी नोकरी मिळण्याची शाश्‍वती नाही. शिवाय गावी थांबूनही हाताला काम मिळेलच हे सांगता येत नाही. त्यामुळे बेरोजगारीचा धोका निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

सुरक्षा रक्षकांना अधिक आग्रह... 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पहिल्या टप्प्यात परतलेल्यामध्ये सुरक्षा रक्षकांचाही समावेश आहे. बोर्डाकडे व खासगी कंपनीतील हे सुरक्षा रक्षक आहेत. सदरचे सुरक्षा रक्षक गावी परतले तरी बोर्डाचे, खासगी कंपन्यांचे काम सुरू होते. त्यामुळे कामावर थांबलेल्यांवर गेल्या दोन-सव्वादोन महिन्यात मोठा ताण वाढला आहे. त्यामुळे कामावर हजर होण्यासाठी सुरक्षा रक्षकांना अधिक आग्रह केला जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

IND vs NZ, 1st ODI: विराट कोहलीचं शतक हुकलं, पण भारतानं मैदान जिंकलं! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

Bigg Boss Marathi 6 Live Update: लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अनुश्री मानेची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

SCROLL FOR NEXT