कागल ः नव्या पुलामुळे दरवर्षी पावसाळ्यात बेटाचे स्वरूप येणाऱ्या सुळकूडचा महाराष्ट्राशी बारमाही संपर्क राहील, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज व्यक्त केला. या गावाला जोडणारे कसबा सांगाव, कोगनोळी, कुन्नूर, आडी - बेनाडी आणि हंचनाळ या पाचही गावांचे मार्ग दर्जेदार बनवू, अशी ग्वाहीही श्री. मुश्रीफ यांनी दिली.
सुळकूड (ता. कागल) येथील दूधगंगा नदीवरील नव्या पुलाचा लोकार्पण सोहळा श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते हवेत रंगीबेरंगी फुगे सोडून झाला. यावेळी श्री. मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाला खासदार संजय मंडलिक प्रमुख पाहुणे होते. हा पूल 120 मीटर लांब व 25 फूट रूंद असून, यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी खर्च केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, प्रताप ऊर्फ भैया माने, सरपंच ज्योती अरुण पाटील-पोवाडे,
कार्यकारी अभियंता एम. एस. कुलकर्णी, उपअभियंता यु. डी. कोकणे, कनिष्ठ अभियंता जे. बी. गायकवाड व उमेश पंचारिया यांचा सत्कार करण्यात आला.
तुम्ही वचन पूर्ण केलं........
यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुळकूडचे रहिवासी असलेले सुरेश भानू मोरे यांनी लिहिलेले पत्र दाखवले. या पत्रात श्री. मोरे यांनी लिहिले आहे, "मुश्रीफसाहेब, 2004 ला 16 वर्षांपूर्वी तुम्ही वचन दिले होते, सुळकूडचा पूल मी बांधणार आणि उद्घाटनही माझ्या हस्ते करणार...... तुमचे ते वचन आज पूर्ण झाले.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.