कोल्हापूर

जातिनिहाय जनगणनेची माजी मंत्री अण्णा डांगे यांची मागणी

अण्णा डांगे ः ओबीसींना ३० टक्के आरक्षण हवेच

सकाळ वृत्तसेवा

सांगली: देशाची जनगणना जातिनिहायच झाली पाहिजे. महाराष्ट्र स्थापनेपासून ओबीसींना मिळालेले ३० टक्के आरक्षण कायम राहिले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री अण्णा डांगे (Anna Dange) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

राष्ट्रवादीने माझ्या अनुभवाची फारशी दखल घेतली नाही; अण्णा डांगे

आरक्षणाचे अधिकार राज्यांना देण्याचा विचार हा देशात फुटीचा प्रारंभ ठरू शकतो. पंतप्रधान चुकीच्या विचाराने वाटचाल करत आहेत, जातिनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध असला तरी तो चुकीचाच आहे, अशी टीका त्यांनी केली.

ते म्हणाले, ‘‘पंतप्रधानांनी ओबीसींना २७ टक्के आरक्षण जाहीर केले आहे. महाराष्ट्र स्थापनेपासून ते ३० टक्केच मिळाले आहे. ते तसेच राहिले पाहिजे. ओबीसींसह सर्वांचीच जातनिहाय गणना झाली, तरच संख्या कळेल व मागासलेल्यांना हात देता येईल. धनगर समाजात ३२ जाती आहेत; पैकी तीन पोटशाखा वगळून २९ शाखांनी आपली जात फक्त धनगर नोंदवली पाहिजे. ती न लावल्यामुळेच धनगर समाजाची संख्या कमी नोंदवली जात आहे.’’

ते म्हणाले, ‘‘धनगर समाजावर सर्व पातळ्यांवर अन्याय होत आहे. शैक्षणिक प्रवेशात गुणवत्तेतील विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या कोट्यात का आणले जात आहे? तेथे कमकुवतांना संधी मिळाली पाहिजे. ओबीसी मुला-मुलींसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह बांधले पाहिजे. ८० टक्के लोकांनी आपला मूळ शेळी-मेंढी पालनाचा व्यवसाय सोडला आहे. सल्फेट-फॉस्फेटच्या जमान्यात लेंडी खताची गरज उरली नाही, असे शेतकरी समजतोय, बांधावरून धनगराला हुसकावतोय, मारहाण करतोय. हे गंभीर आहे. शेळ्या-मेंढ्या चोरणेही नित्याचे झाले आहे. अशा कृती करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करावी. शेळी-मेंढी पालन व्यवसायाचे पुनरुज्जीवन केले पाहिजे. शेळी-मेंढी महामंडळ बिनकामी झाले आहे. त्याची उपेक्षा केली आहे. या महामंडळातर्फे बंदिस्त शेळी पालनासाठी खास अनुदान द्यावे.’’

राष्ट्रवादीकडून दखल नाही

अण्णा डांगे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीने माझ्या अनुभवाची फारशी दखल घेतली, असे म्हणता येणार नाही. पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्षपद दिले, त्या काळात क्रांतिकारी निर्णय घेत मंदिराला बडव्यांपासून मुक्त केले. माझे वय आता ८६ आहे. मला पुन्हा राजकारणात यायचे नाही, पण माझे काम आता धनगर समाजात अस्मिता जागृत करण्याचे असेल. धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा, अशी समाजाची स्थिती झाली असून ती सुधारता येईल. त्यासाठी प्रयत्न करत राहीन.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

SCROLL FOR NEXT