कोल्हापूर

पंचगंगाप्रेमींनी केला, घाट परिसर स्वच्छ

प्रतिनिधी

कोल्हापूरः लॉकडाउन काळात पंचगंगा नदीचे पाणी स्वच्छ व नितळ झाले आहे. इतर वेळी नदीच्या पाण्यात निर्माल्य, कचरा, प्लास्टिक टाकले जात होते. ते लॉकडाउन दरम्यान पूर्णतः बंद झाले. त्यामुळे पंचगंगा नदीने पूर्णतः मोकळा श्‍वास घेतला; परंतु काही तळीरामांनी नदीकाठच्या परिसराला "ओपन बार'चे स्वरूप दिले. त्यामुळे हा परिसर बाटल्या, प्लास्टिकने व्यापून गेला. स्वच्छ झालेला नदीकाठ पुन्हा कचऱ्याचे आगर बनला. 
रोज सकाळी नदीघाटावर फिरायला येणाऱ्या गिर्यारोहक विजय पाटील, स्वराज्य पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचगंगा नदीकाठाची ही दयनीय अवस्था पाहिली व पहाटे सहा वाजताच येथील बाटल्या गोळा करायला सुरवात केली. नदीकाठच्या परिसरात पडलेल्या काचेच्या, प्लास्टिकच्या बाटल्या, स्नॅक्‍सचे रॅपर, कॅरिबॅग, पत्रावळ्या, ग्लास, सिगारेटची रिकामी पाकिटे गोळा करून एका ठिकाणी एकत्रित केली. या गोळा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्‍न समोर असतानाच वृक्षप्रेमी ग्रुपचे तात्या गोवावाला व अमित देशपांडे यांनी हा कचरा संकलित करण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था केली. स्वच्छता निरीक्षक नंदकुमार पाटील यांनी त्वरित दोन कर्मचाऱ्यांसह येऊन परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. 

फिरायला येणाऱ्यांनीही लावला हातभार 
काही सहकाऱ्यांसह श्री. पाटील स्वच्छता करत होते. त्यांची ही धडपड बघून तेथे फिरायला येणाऱ्या काहीजणांनी त्याला हातभार लावला. कोरोना संसर्गाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर असे सर्व नियम पाळून पंचगंगा वाचविण्यासाठी खारीचा वाटा उचलला. लॉकडाउनमुळे का होईना, पंचगंगा नदी व परिसर स्वच्छ झाला. नदीचे हेच सौंदर्य टिकविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे, असेच जणू या युवकांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT