People over the age of 50 have a higher risk of corona 
कोल्हापूर

'या' वयातील लोकांना कोरोनाचा जास्त धोका 

महेश काशीद

बेळगाव - जिल्ह्यात कोरोनामुळे 113 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात पंन्नाशी ओलांडलेल्या 77 जणांचा समावेश आहे. 40 ते 50 वयोगटातील 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे बालक आणि गर्भवतीपेक्षा वृध्दांना अधिक धोका असल्याचे दिसून येत आहे. 

जिल्ह्यात गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडा 6, 640 वर पोहचला. त्यापैकी 2,928 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 3,599 जण उपचार घेत आहेत. पण एकूण 113 जणांचा मृत्यू झाला आहे. रोज 3 ते 4 जणांचा मृत्यू होत आहे. यात सर्वाधिक 50 हून अधिक वयाच्या 77 जणांचा समावेश आहे. 45 ते 50 वयोवयोगटातील 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सुरवातीपासून वृध्दांची काळजी घेण्याबाबत सूचना केली होती. घराबाहेर न पडण्याबाबत आवाहन केले होते. पंरतु, दक्षता न घेणे, सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार मिळताना मर्यादा आल्याने वृद्धांच्या मृत्यूची संख्या वाढली आहे. 


जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी हिरेबागेवाडीत झाला. एप्रिलमध्ये 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर म्हणजे एप्रिल ते जून दरम्यान रुग्णांचा आकडा वाढला. पण, कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही. पण, 1 ते 30 जुलै दरम्यान मृत्यूची संख्या वाढली. या दरम्यान 69 जणांचा मृत्यू झाला. तर 13 ऑगस्टपर्यंत 113 जमांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पंन्नाशी ओलांडलेल्या 77 जणांचा समावेश आहे. 

55 पेक्षा अधिक वय असलेल्यांची चाचणी 

पंन्नाशी ओलांडलेल्यांना कोरोनाचा धोका वाढल्यामुळे 55 हून अधिक वय झालेल्यांची कोरोना चाचणी सक्तीची केली जात आहे. यामुळे प्राथमिक पातळीवर रोगाचे निदान होईल आणि उपचार मिळणे सुलभ होईल, या उद्देशाने हा निर्णय घेण्याची तयारी सुरु आहे. ऑक्‍सीमीटर आणि थर्मल स्कॅनर माध्यमांनी तपासणी केली जाणार आहे. पंरतु, 55 हून कमी वय असलेल्या व्यक्तीची लक्षणे जाणविल्यास चाचणी केली जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तेथे सूचना करण्यात आल्या आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT