Placement opportunities even during the comforting Corona period
Placement opportunities even during the comforting Corona period 
कोल्हापूर

दिलासादायक... कोरोना काळातही प्लेसमेंटच्या संधी 

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : वर्षभरापासून असणारी आर्थिक मंदी, त्याचच आलेले कोरोनाचे संकट यामुळे उद्योग क्षेत्राची स्थिती बिकट झाली. जिल्ह्यातील काही प्रमूख अभियांत्रिकी महाविद्यालयांत फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून त्यातून सुमारे 800 ते 1 हजार विद्यार्थ्यांची निवड झाली.

या विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांत काम करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांची शेवटच्या वर्षाबद्दल जरी निर्णय झाला नसला तरी या विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकरीवर त्याचा परिणाम होणार नसल्याचे महाविद्यालयांकडून सांगण्यात आले आहे. 

कोरोना संकटाचा परिणाम केवळ आरोग्यावरच नव्हे तर उद्योग विश्‍वावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही झाला. बहुतांशी उद्योग संस्थांनी होणारे नुकसान कमी करण्यासाठी कर्मचारी कपात करण्याचे धोरण स्विकारले. त्यामुळे नोकरी जाण्याचे प्रमाण वाढले. पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळणार कशी? असा प्रश्‍न निर्माण झाला.

या साऱ्या नकारात्मक पार्श्‍वभूमीवर दिलासा देणारी एक बाब समोर आली. जिल्ह्यातील आघाडीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांत फेब्रुवारी, मार्चमध्ये जे कॅम्पस इंटरव्हयू झाले होते. कोव्हीड मंदीच्या पार्श्‍वभूमीवर या विद्यार्थ्यांना रुजू होण्याचे पत्र मिळणार नाही, त्यातच शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द झाली तर महाविद्यालयांनी निवडलेली गुणपद्धती या कंपन्यांना चालणार का?. अशी शंका होती. मात्र बहुतांशी विद्यार्थ्यांना रुजू होणारे पत्र मिळाले आहे.  याबाबत के.आय.टी महाविद्यालयाचे प्रा. सुभाष माने म्हणाले, "15 मार्च पूर्वी ज्या कंपन्या आल्या, त्यांनी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. मुलाखती घेतल्या. त्यांना आवश्‍यक असणारी कौशल्ये विद्यार्थ्यांत आहे का? हे त्यांनी पडताळले. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यातील बहुतांशी विद्यार्थी अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शेवटच्या वर्षाची परीक्षा जर रद्द झाली तरी गेल्या सत्रातील गूण आणि अंतर्गत परीक्षांचे गूण या आधारावर त्यांचे मुल्यमापन होईल. याचा परिणाम त्यांच्या नोकरीवर होणार नाही.' कंपन्यांनी निवड केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना रुजू करून घेण्यात येईल. असे या कंपन्यांनी सांगितले आहे. 

आर्थिक स्थिती चिंताजनक असताना मोठ्या प्रमाणात प्लेसमेंट झाल्या आहेत. याचा अर्थ कोणत्याही संस्थेत चांगल्या मनुष्यबळाची गरज असते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. ज्या विद्याशाखेचे आपण विद्यार्थी आहेत, त्या शाखेचे अद्ययावत आणि सखोल ज्ञान घेतले पाहीजे. 
- डॉ.व्ही.व्ही.कार्जिन्नी, संचालक, केआयटी, महाविद्यालय. 

या कंपन्यांनी केली प्लेसमेंट 
*कॅपजेमिनी * टेक महिंद्रा * टी.सी.एस * कॉग्निझंट * इंटेल * टेक्‍नीमॉंट * ब्लॅक अण्ड व्हिच, इंटेल. 

महाविद्यालयनिहाय निवड झालेले विद्यार्थी असे : 
* केआयटी महाविद्यालय - 250 
* डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय - 275 
* तात्यासाहेब कोरे इंजिनिअरींग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी - 175 
* संजय घोडावत विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT