Cooperative Societies Election esakal
कोल्हापूर

Cooperative Societies Election : सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 'या' तारखेपर्यंत स्थगिती; राज्य शासनाचा आदेश जारी

राज्यातील २४, ७१० सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित असून, पैकी ८३०५ संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्य पातळीवरच निवडणूक स्थगितीचा निर्णय झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २९१ निवडणुकांच्या कार्यक्रमांनाही स्थगिती दिली आहे.

कोल्हापूर : ऐन पावसाळ्यात (Monsoon Season) होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकींना (Cooperative Societies Election) तीस सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाने प्रसिद्ध केले. राज्यातील २४, ७१० सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित असून, पैकी ८३०५ संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया आता पावसाळा संपेपर्यंत स्थगित राहणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील २९१ संस्थांचा समावेश असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.

हवामान विभागाने (Meteorology Department) अंदाज व्यक्त केलेनुसार १२ जूनअखेर राज्यातील १४ जिल्ह्यांत मागील वर्षाच्या सरासरी १०० टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पाच जिल्ह्यांत सरासरीच्या ७० टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणी, पीक लागवड व शेतीच्या इतर कामांत व्यस्त आहेत. अनेक संस्थांमध्ये शेतकरी सभासद असल्यामुळे ते सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुका स्थगित केल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे राज्यातील निवडणूक कार्यक्रमांना ‘जैसे थे’ आदेश मिळाले होते. त्यामुळे ३० मेपर्यंत निवडणुकांसाठी ज्या ठिकाणी प्रक्रिया थांबवलेली होती,ं त्याच ठिकाणी थांबली. मतमोजणी झाल्यानंतर पुन्हा सात जूनला निवडणुका ज्या ठिकाणी स्थगित होत्या तेथून पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पावसाळ्यात अधिक पाऊस पडेल, असा अंदाज घेऊन पुन्हा निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती दिली आहे.

सहकारी गृहनिर्माण संस्थांची निवडणूक घ्या

दरम्यान, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने सहकारी गृहनिर्माण संस्थांची निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन केवळ अध्यक्ष- उपाध्यक्ष निवड बाकी आहे, अशा सहकारी संस्थांना वगळून हा आदेश लागू केला आहे.

राज्य पातळीवरच निवडणूक स्थगितीचा निर्णय झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २९१ निवडणुकांच्या कार्यक्रमांनाही स्थगिती दिली आहे. पावसाळी हंगाम संपल्यानंतर साधारण तीस सप्टेंबरनंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार पुन्हा कार्यक्रम नियमित होतील.

-नीळकंठ करे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT