जरबेरा
जरबेरा sakal
कोल्हापूर

जरबेरा उत्पादक शेतकऱ्यांवर दराचे संकट; आर्टिफिशल फुलांना अधिक भाव

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर: ऐन गणेशोत्सवात जरबेरा उत्पादक शेतकऱ्यांवर दराचे संकट विघ्न कोसळले आहे. दोन दिवसांत जरबेरा दर निम्याने कमी होऊन तो दोन रुपयांवर स्थिरावल्याने जरबेरा फूल उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. खऱ्याखुऱ्या फुलांपेक्षा आर्टिफिशल फुलांच्या माळांना अधिक चांगला भाव मिळत असल्याने फुल उत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे. बदलत्या वातावरणाचा फटका बसत असताना दर आणि वाढत्या खर्चाचा दुहेरी फटका बसत आहे.

दोन वर्षांपासून जरबेरा उत्पादकांना लॉकडाऊनचा फटका बसत आहे. लग्न समारंभ, कार्यक्रमांना परवानगी नसल्याने व मंदिरे बंद असल्याने फुलांच्या मागणीत घट झाली. मुंबई, पुणे, हैदराबाद, बडोदरा, बेंगलोर ही जरबेरा फुलाची मुख्य बाजारपेठ आहे. मात्र, मागणीच नसल्याने मध्यंतरी शेतकऱ्यांना उत्पादित जरबेरा फेकून द्यावा लागला होता. काही दिवसांपासून लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कार्यक्रमांना परवानगी मिळाली.

हळूहळू चांगला दर मिळेल या आशेवर असणाऱ्या फुल उत्पादकांना पदरी निराशा आली आहे. दोन दिवसांपूर्वी फुलांमागे चार रुपये दर होता तो आता दोन रुपयांवर आला आहे. गणेशोत्सवात फुलांना किमान आठ ते दहा रुपये दर मिळेल, अशी अपेक्षा होती.

फुलाला सात ते आठ रुपये दर मिळाला तरच उत्पादक नफ्यात राहतो. मात्र, नफा तर दूरच उत्पादन खर्चही निघणे मुश्कील बनले आहे. मार्च ते जुलैकडे हंगाम म्हणून पाहिले जाते. या काळात लग्नसराई सुरू असते. आपोआपच फुलांना मागणी वाढून शेतकऱ्यांच्या पदरी चार पैसे पडतात. मात्र, कार्यक्रमांवर मर्यादा आणि मंदिरे बंदचा फटका उत्पादकांना बसला आहे.

दर नाही; अनुदानही बंद

गेल्या दोन वर्षात जरबेऱ्याला दर नाही. शासनाने अनुदानही दिले नाही. त्यामुळे कर्जावरील व्याज वाढत आहे. वाढीव खर्च, दर आणि अनुदान अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. नजीकच्या कर्नाटक राज्यात ७० टक्क्यांपर्यंत अनुदान शेती मशागतीपासून दिले जाते. इथे मात्र अनुदान नाहीच दराची शाश्वतीही नाही.

हमीभाव हवा

फुल पिकाला हमीभाव नसल्याने दराचा प्रश्न निर्माण होतो. किमान दर निश्चित केल्यास फुल उत्पादक मोठ्या नुकसानीपासून वाचेल. अन्य पिकांप्रमाणे फुलनाही हमीभाव हवा. फुलशेतीला एकरी ६८ लाख रुपये खर्च येतो. औषधे, खते, मजुरीच्या खर्चात वाढ झाली असताना त्या तुलनेत दर मिळत नाही. शासनाने फुलांना हमीभाव देण्याची गरज आहे. खऱ्या फुलांपेक्षा आर्टिफिशल फुलांना अधिक दर मिळत असल्याने फुल उत्पादकांकडे शासनाचे किती दुर्लक्ष आहे हे लक्षात येते. -जोतिराम जाधव, जरबेरा उत्पादक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT