radhanagari dam gate open today morning 
कोल्हापूर

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे पुन्हा उघडले

सकाळ वृत्तसेवा

राशिवडे बुद्रुक : गेली दोन दिवस उसंत घेतल्याने पावसाने राधानगरी तालुक्यात पुन्हा जोर वाढला आहे. यामुळे राधानगरी धरणाच्या स्वयंचलित सात दरवाज्यांपैकी दोन दरवाजे आज पुन्हा खुले झाले आहेत. त्यामुळे वीज गृहातून 4256 इतका विसर्ग भोगावती नदीत सुरू झाला आहे. दरम्यान काळम्मावाडी धरण 91 टक्के भरले आहे. यामध्ये 23 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर तुळशी जलाशयातून पाणी नियंत्रित करण्यासाठी आज सायंकाळी विसर्ग करण्यात येणार आहे. 
जलाशयातील तीन दरवाज्यांवर 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

सतत पंधरा दिवस पावसाने झोडपून काढल्यानंतर गेली तीन दिवस पावसाने उघडीप दिली होती. यामुळे तालुक्यातील तिन्ही धरणांचा पाणीसाठा नियंत्रित झाला होता. पाणलोट क्षेत्रातून येणारी पाण्याची आवक विचारात घेता राधानगरी आणि काळम्मावाडी धरणातून वीज निर्मितीसाठीच फक्त विसर्ग सुरू होता. राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले होते. आज पडलेल्या पावसामुळे दोन स्वयंचलित दरवाजे सकाळी दहा वाजता खुले झाले. परिणामी भोगावती नदी पात्रातून 4256 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

काळम्मावाडी धरण 91 टक्के भरले असून यातून वीज निर्मितीसाठी 1800 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तुळशी धरण पाणलोट क्षेत्रात आज पावसाने चांगला जोर धरला आहे. याच्या वक्राकार दरवाजातून आज सायंकाळी तुळशी नदीमध्ये विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. याच्या तीन दरवाज्यावर तिरंगी विद्युत रोषणाई करून पाण्याला भारतीय ध्वजाचा रंग दिला जाणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dam Water Level : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! धरणांमध्ये 70 टक्के पाणीसाठा, पाणीटंचाईला दिलासा!

Nagpur News : सांगा, कसं करायचं आपत्ती व्यवस्थापन? अनेक गावं धोकादायक पातळीवर, पण सरकार अजूनही झोपेत, ९१ गावांत ‘व्हिलेज किट’च नाही...

Guru Purnima : 'श्री स्वामीचरणी तीन लाख भाविक नतमस्तक'; स्वामीनामाच्या जयघोषात श्री वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा साजरी

11th Admission Process: अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी 'या' तारखेला होणार जाहीर; जाणून घ्या जाणून घ्या प्रवेशाचे पुढचे टप्पे

धक्कादायक! प्रेमसंबंधातून जन्मदात्या आईने पोटच्या तीन निष्पाप मुलांची केली हत्या; प्रियकराला जन्मठेप तर, आईला मृत्युदंडाची शिक्षा

SCROLL FOR NEXT