कोल्हापूर

राधानगरी धरणाच्या अत्याधुनिक दरवाजांची योजना मार्गी लागण्याची शक्यता

मोहन नेवडे

राधानगरी : खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी विशेष दखल घेतल्याने राधानगरी धरणाला अत्याधुनिक तंत्राचे दरवाजे (स्वयंचलित दरवाजे वगळून) बसविण्याची योजना आगामी काळात मार्गी लागण्याची शक्यता बळावली आहे. स्वयंचलित दरवाजांच्या अभ्यासाबरोबरच तज्ज्ञांची मते आजमावून निर्णय घेण्याचे कोल्हापूर दौऱ्यात (kolhapur visit) स्पष्ट केले. यातून धरणाला दरवाजे बसविण्याच्या योजनेला आता राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ मिळाले आहे.

यंदाच्या पूरस्थितीने (kolhapur flood) या धरणाला अत्याधुनिक तंत्राच्या दरवाजे बसवण्याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. उपमुख्यमंत्र्यांनी या विषयी गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाहीच्या दृष्टीने आश्वासक पाऊल उचलले आहे. हे धरण पूर्ण भरल्यानंतर स्वयंचलित दरवाजे खुले होतात. पाणीसाठ्यात वाढ होईल त्याप्रमाणात टप्प्याटप्प्याने पाणी विसर्गाची व्यवस्था नाही. त्यासाठी धरणाला रिडल गेट बसविण्याची गरज यापूर्वीच जलसंपदा विभागाने स्पष्ट केली. त्यादृष्टीने तांत्रिक पाहणीनंतर दोन पर्यायी योजना चर्चेत आल्या. प्रत्यक्षात योजनेची निश्चिती झालीच नाही.

वर्षानुवर्षे रिडलगेटची योजना कागदावरच राहिली. त्यानंतर काही महिन्यापूर्वी धरणाच्या सर्व्हिसगेटचे (सेवाद्वार) ऑटोमायजेशन केले. जुने यांत्रिकी दरवाजे (स्वयंचलित दरवाजे वगळून) काढून अत्याधुनिक तंत्र असलेले ऑटोमाईझ्ड गेट बसवण्याची योजना जलसंपदा विभागाने पुढे आणली. मात्र, अंतिम निर्णयाला चालढकल सुरू राहिली आहे. अतिवृष्टी काळातच धरण पूर्ण भरून स्वयंचलित दरवाजे खुले झाल्यास पूरस्थिती बिकट होते. हा गेल्या काही वर्षातील कटू अनुभव आहे. आधी धरणाला रिडलगेटची योजना केवळ विचाराधीनच राहिली. आता सर्व्हिस गेटचे ऑटोमायजेशन योजनेची तीच गत होणार नाही याची दक्षता यंत्रणेला घ्यावी लागणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित

आता उपमुख्यमंत्र्यांनीच या विषयाला हात घातल्याने धरण दरवाजांच्या समस्येच्या उकलेची दिरंगाई संपणार आहे. धरणाच्या मजबुतीकरणाची योजना 1980 च्या दशकात तीन टप्प्यात प्रस्तावित झाली. यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील सांडवा पुनर्बांधणीचे (रिडल गेट) काम झालेच नाही. गेले चार दशके केवळ प्रस्तावितच राहिले, तर धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होण्याआधी आपत्कालीन दरवाजे तात्काळ सुरू करता येतील अशी व्यवस्था करावी, अशी सूचना जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी दोन वर्षांपूर्वी धरण पाहणी वेळी केली आहे. यातून पूरस्थिती नियंत्रणासाठी आणि धरण सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्राच्या दरवाजांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT