rajesh kshirsagar satej patil kolhapur
rajesh kshirsagar satej patil kolhapur 
कोल्हापूर

अन्यथा २०१४ ची वेळ यायला वेळ लागणार नाही ; राजेश क्षीरसागर यांचा सतेज पाटील यांना इशारा 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील हे शिवसेनेचे बोट धरून विधानभवनात गेले. हे आता ते विसरले आहेत. 2019 ला आम्हाला धोका देण्याचे त्यांनी काम केले. राजकारणात चढ-उतार होत असतात, खाली यायला वेळ लागत नाही. माझ्यावर काहीही खापर फोडू नका अन्यथा 2014 ची वेळ यायला वेळ लागणार नाही, असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला.

 कसबा बावडा येथे झालेल्या सभेत पालकमंत्री पाटील यांनी क्षीरसागर यांनी आंबेवाडी येथे मेळावा घेऊन शिवसेना स्वबळावर लढेल असे सांगितले. नंतर राष्ट्रवादीने स्वबळाचीच भाषा केली. त्यामुळे मी ही कॉंग्रेस स्वबळावर लढेल असे वक्तव्य केले. त्याचा संदर्भ घेत क्षीरसागर यांनी आज खासगी वृत्तवाहिनीवर प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, बावडा येथील फिक्‍सिंग मेळाव्यातील भाषणात सतेज पाटील यांनी क्षीरसागर यांनी पहिल्यांदा स्वबळावर लढू असे जाहीर केल्याचे नमूद केले. आम्ही नव्हे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिल्यांदा सर्व जागा लढणार असल्याचे सांगितले. नंतर कॉग्रेसनेही स्बबळाची भाषा केली. शिवसेना हा स्वाभिमानी पक्ष आहे. आम्हाला कमी जागा देऊन कॉंग्रेसच्या जास्तीत जास्त लढविण्याचा त्यांचा हेतू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही ते ओव्हरटेक करू पाहत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही सतर्क झाले आहेत. 2014 ला सतेज पाटील यांचा पराभव झाला. नंतर 2017 ला शिवसेनेने मदत केल्यामुळे ते विधानपरिषदेत गेले. त्याचा विसर पडला आहे. त्यांना हव्या त्यावेळी शिवसेनेचा वापर करतात.

राज्यस्तरावर त्यांना वाटा हवा मात्र कोल्हापुरात काही द्यायचे म्हंटले की तयार होत नाहीत. 2014 ला महादेवराव महाडिक हे आमदार होते. अमल महाडिकही आमदार होते. धनंजय महाडिक हे खासदार तर शौमिका महाडिक या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. त्यावेळी सतेज पाटील हे काहीही नव्हते. आता ते पालकमंत्री आहेत तर पुतणे आमदार आहेत. राजकीय परिस्थिती तशीच राहत नाही. त्यात चढःउतार होतात. पाटील हे आघाडीचे नेते आहेत. त्यांनी वागण्यात सुधारणा करावी. आम्ही मदत करूनही 2019 ला त्यांनी धोका दिला. मी गेल्या दीड वर्षात काहीही बोललो नव्हतो. झाले गेले विसरून जाऊ अशी भुमिका राहिली. पाटील यांनी सुधारणा न केल्यास 2014 ची वेळ येण्यास फार वेळ लागणार नाही. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT