raju shetty criticism Gesture to central government 
कोल्हापूर

अन्यथा हा वणवा देशभर पेटेल ; राजू शेट्टी यांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर -  केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहे. लॉकडाउनच्या काळात काही मंत्र्यांनी घेतलेला चुकीचा निर्णय शेतकऱ्यांवर लादला जात आहे. याविरुद्ध दिल्लीत शेतकरी थंडीत कुडकुडत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या तत्काळ मान्य केल्या पाहिजेत, अन्यथा देशभर वणवा पेटेल, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ‘भारत बंद’च्या पार्श्‍वभूमीवर बिंदू चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

भांडवलदारांच्या हातचे खेळणे बनलेले मोदी सरकार नेस्तनाबूत करा, असे आवाहन विविध पक्ष, संघटनांच्या ठिय्या आंदोलनावेळी वक्‍त्यांनी केले. यावेळी चले जाव-चले जाव मोदी सरकार चले जावो, अशा जोरदार घोषणा दिल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (गवई गट), शेकाप, लालनिशाण, आम आदमी पक्षासह इतर संघटनांचे कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा. आंदोलनाबाबत उलट-सुलट टीकाटिप्पणी केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटत आहे. त्यामुळे, उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा अखिल किसान संघर्ष समितीने दिला.

माजी आमदार संपतराव पवार-पाटील म्हणाले, ‘‘प्रत्येकवेळी शेतकरीच पिचला जात आहे. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना हानिकारक आहेत.’’

उदय नारकर म्हणाले, ‘‘देशात मोदींची मुजोर सत्ता आहे. बळिराजाला गाढण्याचे सरकार काम करत आहे.’’
जिल्हाध्यक्ष विजय देवणे म्हणाले, ‘‘ज्या-ज्यावेळी या देशात दादागिरी केली जाते. त्या-त्या वेळी त्यांची दादागिरी उतरवण्याचे काम जनतेने केले आहे.’’

अतुल दिघे म्हणाले, ‘‘कामगार कायदे मोडल्यामूळे कामगारांचे नुकसान झाले. त्यांच्या उत्पन्नामध्ये घट झाली आहे. भांडवदारांच्या हातचे खेळणे बनलेले मोदी सरकार नेस्तानाबूत 
केले पाहिजे.’’

सतीशचंद्र कांबळे म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने केलेले कायदे म्हणजे शेतकऱ्यांसाठी काळा दिवसच आहे.’’

शारंगधर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. महापौर निलोफर आजरेकर, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार, प्रा. जनार्दन पाटील, विश्‍वासराव देशमुख, टी. एस. पाटील, अजित पाटील, विक्रम पाटील, गिरीश फोंडे 
उपस्थित होते.

शहा हे इराणी नाव
हैदराबाद, औरंगाबादचे नाव बदलू पाहणाऱ्यांनी अमित शहा यांचे आडनाव बदलावे. कारण शहा हे इराणी नाव आहे. त्यामुळे त्यांचे नाव बदलले पाहिजे, अशी टीका नारकर यांनी केली.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT