Rural Border Crime 'Hotspot' Kolhapur Marathi News
Rural Border Crime 'Hotspot' Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

ग्रामीण सीमाभाग गुन्हेगारीचे "हॉटस्पॉट'

गणेश शिंदे

जयसिंगपूर : बनावटगिरीने शिरोळ तालुक्‍यातील अर्थकारणासह खाद्यपदार्थांनाही विळखा घातला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग गुन्हेगारीसाठी सोयीचा ठरत असल्याने सीमाभागातील ग्रामीण भागात गुन्हेगारी मूळ धरत असल्याचे स्पष्ट झाले. बनावट दूध, खवा, मद्य, नोटानंतर आता बनावट परवाने देणारे रॅकेट उघडकीस आले असले, तरी अद्यापही अनेक बाबतीत बनावटगिरीचा गोरख धंदा सुरूच आहे. मात्र, तो उघडकीस येत नसल्याने "झाकली मूठ सव्वा लाखाची' असेच चित्र तालुक्‍यात आहे. 

"मिरींडा' या ब्रॅंडखाली चिंचवाड (ता. शिरोळ) येथे बनावट दूधनिर्मितीचे रॅकेट तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप कदम यांनी उघडकीस आणले. यानंतर या व्यवसायाचा विस्तार डोळे पांढरे करणारा ठरला. पोलिसांच्या या धाडसी आणि कौतुकास्पद कामगिरीमुळे आजपर्यंत पुन्हा हा बनावट दुधाचा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस कोणाचे झाले नाही. यापाठोपाठ बनावट खव्याचा प्रकार उघडकीस आला. शिरोळ तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन होते. यातून उपपदार्थांच्या निर्मितीत कोट्यवधीची उलाढाल होत असते. बनावट खव्याच्या निर्मितीतून माया गोळा करणारी टोळी यंत्रणेच्या नजरेत आली आणि कारवाई झाली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील अनेक ग्रामीण भागांत गुन्हेगारांनी मोर्चा वळविला आहे. गुन्हे करून परराज्यांत सहीसलामत जाण्यासाठी हा भाग सोयीचा मानला जातो. त्यामुळे आजवर अधिकाधिक कारवाया सीमाभागातील गावांमध्येच झाल्या आहेत. 

बनावटगिरीच्या धंद्यात आता बनावट परवान्यांची भर पडली आहे. बनावट बांधकाम परवाने, बनावट झोन दाखल्यांसह अनेक बनावट कागदपत्रे शासनाचे बनावट शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या सहीने दिले जात आहेत. शासकीय कार्यालयांत परवान्यांसाठी होणारा विलंब लक्षात घेऊन दलालांची साखळी सक्रिय झाली. दलालांच्या माध्यमातून काम लवकर होते, अशी भावना झाल्याने दलालांना अच्छे दिन आले. यातूनच बनावट परवान्यांचा धंदा सुरू झाला. वेळीच कामे करण्याची अधिकाऱ्यांची मानसिकता असती तर कदाचित बनावट परवान्यांचा धंदा रोखणे शक्‍य झाले असते. बनावटगिरीने शिरोळ तालुक्‍याच्या लौकिकाला गालबोट लावले असून, हे धंदे मोडीत काढण्याचे आव्हान यंत्रणेपुढे निर्माण झाले आहे. 

धाक कमी; बनावटगिरीची हमी 
शिरोळ तालुक्‍यात बनावटगिरीवर धाक नसल्याने अनेक जण या व्यवसायातून मालामाल होण्याचे स्वप्न पाहत आहेत. याला काही प्रमाणात यंत्रणाही कारणीभूत ठरली. गुन्हेगारांवर धाकच नसल्याने बनवटगिरीला खतपाणी मिळत असल्याचा आरोप होत आहे. 

महाराष्ट्र, कर्नाटक पोलिसांत समन्वय हवा 
दोन्ही राज्यांच्या सीमेवरील गावांमध्ये बनावटगिरीचा धंदा सुरू आहे. दोन्ही राज्यांतील पोलिस यंत्रणेने यावर नियंत्रण राखण्यासाठी समन्वय राखण्याची गरज आहे. पोलिसांनी ठरविले तर सीमाभागातील हे उद्योग बंद करणे सहज शक्‍य आहे. 

नवख्यांची गुन्हेगारीत वाटचाल चिंताजनक 
सीमाभागातील गावांमध्ये सुरू असणाऱ्या बनावट धंद्यात पोलिस रेकॉर्डवर नसलेल्या गुन्हेगारांची पोलिसांना चिंता आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा तपास करणे शक्‍य आहे. मात्र, नवख्या गुन्हेगारांची माहिती मिळेपर्यंत बराच विलंब होतो. यासाठी गावागावांतील लोकांनीच आता अशा व्यवसायावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT