Schools ignorant about Visakha Samiti 
कोल्हापूर

विशाखा समितीबाबत शाळांच अनभिज्ञ 

नंदिनी नरेवाडी

कोल्हापूर : माध्यमिक शाळांत अंतर्गत तक्रार समिती (विशाखा समिती) कायद्याने स्थापन करणे बंधनकारक असल्याचा शाळांना विसर पडला आहे. केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्या शाळांना विशाखा समितीची माहितीच नाही, हे वास्तव समोर आले आहे. तीन वर्षांपूर्वी सर्व शाळांना या समित्या स्थापन करण्याविषयीचा आदेश दिला. मात्र या आदेशाला शाळांचा प्रतिसादच मिळालेला नाही. 

काही मोजक्‍याच शाळांत ही समिती असून त्याचे काम नियमित सुरू आहे. मात्र अजूनही काही शाळा या समितीबाबत अनभिज्ञ आहेत. तर काही शाळांत ही समिती कागदावरच असल्याचे चित्र आहे. महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाला प्रतिबंध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 1996 साली मार्गदर्शक तत्त्वे दिली. या तत्त्वांना विशाखा आदेश म्हटले जाते. याच विशाखा आदेशाचा 2013 साली संसदीय कायदा झाला. या कायद्यानुसार प्रत्येक शाळा, महाविद्यालयांत महिला तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे.

परंतु काही शाळांनी विशाखा समिती स्थापन करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. दर महिन्याला या समितीची बैठक होणे अपेक्षित आहे. शाळेत समितीतर्फे घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांबाबतचा अहवाल शिक्षण विभागाकडे देणेही बंधनकारक आहे. परंतु अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेले नाहीत. 

समितीचे फलक लावणे बंधनकारक 
प्रत्येक शाळेत विशाखा समितीची स्थापना केल्यानंतर त्या समितीचे अध्यक्ष, सचिव व इतर सदस्यांचे नाव असलेला फलक परिसरात लावणे बंधनकारक आहे. तसेच समितीच्या पदाधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही या फलकावर लिहिणे आवश्‍यक आहे. 

विशाखा समितीचा उद्देश 
* शालेय आवारात, कार्यालयात होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळावर प्रतिबंध घालणे 
*महिला कर्मचारी, विद्यार्थिनी यांच्या समस्या सोडवणे 

समितीची रचना अशी : 
* मुख्याध्यापिका किंवा सेवाज्येष्ठ शिक्षिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था महिला प्रतिनिधी - अध्यक्ष 
* मुख्याध्यापिका किंवा सेवाज्येष्ठ शिक्षिका - सचिव 
* सामाजिक कार्य करणाऱ्या महिला 
* शाळेतील एक शिक्षिका 
* शाळेतील एक शिक्षकेतर कर्मचारी 

जरगनगरात रोडरोमिओंचा त्रास 
"सकाळ'ने महिला व मुलींच्याबाबतीत छेडछाडीचे प्रसंग घडत असतील तर "व्यक्त व्हा...' आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जरगनगर येथील एका शाळेसमोरील असलेल्या सर्व्हिसिंग सेंटरमध्ये बसून रोडरोमिओ त्रास देतात तर काही अनोळखी क्रमांकावर फोन येत आहेत. अशा आशयाच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. 

सर्व शाळा, महाविद्यालयांत विशाखा समिती स्थापन करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. तीन वर्षांत या समितींचा अहवाल तसेच तक्रारीही कार्यालयाकडे मिळालेल्या नाहीत. 
- किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यातील दीड लाख शिक्षकांचा थांबणार पगार! वेतन अधीक्षकांचे शाळांना आदेश; कागदपत्रे अपलोडसाठी १५ सप्टेंबरची मुदत; ‘टीईटी’ संदर्भातील अपडेट काय? वाचा...

सोलापुरात आयटी पार्क होणारच! दरवर्षी येथे तयार होतात ६८०० इंजिनिअर, विमानसेवा सुरू, रेल्वे, महामार्गांची कनेक्टिव्हीटी, उजनी धरणात मुबलक पाणी, सुपर टॅक्स माफ, हायस्पिड इंटरनेटही

आजचे राशिभविष्य - 9 सप्टेंबर 2025

OBC Struggle Committee:'ओबीसी संघर्ष समितीचा साताऱ्यात मोर्चा'; सरकारविरोधात घोषणाबाजी, मराठा आरक्षणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी

चयापचय दर वाढवण्यासाठी...

SCROLL FOR NEXT