Maharashtra News Live Update: लातूरमध्ये तापमानाचा पारा 43 अंश पार, बैल जोडीचा "हीट स्ट्रोकने" मृत्यू
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे, तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअस च्या पुढे गेलाय, रणरणत्या उन्हाचा फटका आता मुक्या प्राण्यांनाही बसताना पाहायला मिळतोय,सावरी येथील शेतकरी मदन भंडारे यांची दीड लाखाची बैल जोडी "हिट स्ट्रोकने" दगावली आहे.
दिवसभर शेत मेहनतीचे काम करून सायंकाळी पाणी पाजून बैल दावणीला बांधले होते ,मात्र दोन्हीही बैल मृत अवस्थेत दिसल्याने एकच खळबळ उडाली, वैद्यकीय माहितीनुसार बैलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने हिट-स्ट्रोकचा बैल जोडीला फटका बसून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर शेतकरी भंडारे यांच तब्बल दीड लाख रुपयांचे नुकसान झाल आहे, जिल्ह्यात आत्तापर्यंत उष्माघाताने तीन मानवी मृत्यू झाले आहेत.