कोल्हापूर

जरबेऱ्याच्या शेतीतून दरवळला यशाचा सुगंध; अक्षयची लाखोंची उलाढाल

मतीन शेख

कोल्हापूर : घरात शेतीची सर्वांना आवड. त्याच्या मनातही शेतीबद्दल रुची निर्माण झाली. शाळेत हुशार असल्याने पोराने शिकावं, अशी सर्वांचीच इच्छा होती. त्याने बारावीनंतर शेती विषयात उच्चशिक्षण घेण्याचे ठरवले. ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये (agri business management) पदवी घेऊन अधिकारी होण्याचे पक्के केले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. विविध परीक्षा देऊनही यशाचा दुष्काळ संपेना. शेवटी त्याने कृषी खात्यात कंत्राटी तत्त्वावर प्रकल्प अधिकारी (project officer) म्हणून काम सुरू केले. तिथे पगारही कमी.

शेवटी त्याने आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला आणि ग्रीन हाउसची (green house) उभारणी करत जरबेरा फुलांची शेती सुरू केली. ही यशोगाथा आहे इस्पुर्ली (ता. करवीर) येथील अक्षय शिवाजी पवार या तरुणाची. आज तो लाखोंची उलाढाल करत बेरोजगार तरुणांना आधुनिक शेतीकडे वळण्याची प्रेरणा देत आहे. अक्षयने २०१० ला पुण्यातून कृषी पदवीचे शिक्षण घेतले. यानंतर एम. पी. एस. सी.चा अभ्यास सुरू केला. कृषीसह तो एस. टी. आय. पी. एस. आय पदासाठी परीक्षा देत होता; पण यश मिळत नव्हते. फक्त अभ्यासच करत राहणे हे त्याला पटत नव्हते. अभ्यासाबरोबर ऑनफिल्ड काम करावे, या उद्देशाने तो कोल्हापूर जिल्हा कृषी विभागात कंत्राटी तत्त्वावर दाखल झाला.

भुदरगड (bhudargad) विभागात फलोत्पादन प्रकल्प अधिकारी म्हणून काम करू लागला. अभ्यास सुरूच होता. नोकरीची हमी नव्हती. पगारही तुटपुंजा. परीक्षेतल्या अपयशाने अधिकारी होण्याचं स्वप्न धुसर होत होतं. वयही वाढतच होतं. घरात अक्षयच्या लग्नाचा ठराव मांडला. पुढे नेमके काय करावे सुचत नव्हते. त्याने काजू प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी बँकेकडे अर्ज केला; पण कर्ज मिळत नव्हते. नंतर त्याने शेती आधुनिक करण्याचे नियोजन आखले. वडील, चुलत्यांनी पाठिंबा दिला. तीन वर्षांपूर्वी मित्र, नातेवाईकांकडून पैशाची जुळवाजुळव करून २५ लाख खर्च करत अक्षयने अर्ध्या एकरात ग्रीन हाउसची उभारणी केली. जरबेरा फुलांची शेती सुरू केली. पहिल्याच वर्षी १० लाखांचा निव्वळ नफा झाला. पुढे कलर कॅप्सिकम, जिप्सोफिलाचे पीक घेतले. यातूनही त्याला चांगले उत्पादन मिळाले. वर्षाला लाखोंची उलाढाल सुरू झाली. सध्या तो जिल्हा कृषी विभागात कंत्राटी टेक्निकल ऑफिसर म्हणूनही सेवा बजावत आहे.

शेतकऱ्यांना सेवा अन् प्रबोधनही...

स्पर्धा परीक्षेतील स्वप्ने अधुरी राहिलेल्या तरुणांना सोबत घेऊन इस्पुर्ली येथे अक्षयने अॅग्री मॉलची तसेच कृषी सेवा केंद्राची उभारणी केली आहे. या माध्यमातून तो शेतकऱ्यांना सेवा पुरवत आहे. बेरोजगार तरुणांना शेतीकडे वळण्याची प्रेरणा, तसेच सल्ला देत आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचे प्रयोग करण्यासाठी प्रबोधन सत्रही चालवत आहे.

"स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र बेभरवशाचे आहे. बेरोजगारी वाढल्याने स्पर्धा वाढली आहे. तरुणांनी कमी कालावधीत झोकून देत अभ्यास करावा. यश मिळाले नाही, तर दुसरा पर्याय ठेवावा. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीत प्रयोग करावेत."

- अक्षय पवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT