Students are not forced to wear masks during the exam period 
कोल्हापूर

परीक्षा काळात विद्यार्थ्यांना मिळणार 'हा' दिलासा...

मिलिंद देसाई

बेळगाव - सध्या सर्वत्र परीक्षांपेक्षा कोरोनाचीच अधिक चर्चा होत असली, तरी विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेकडे लक्ष केंद्रीत करावे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना मास्क लावून येण्याची सक्ती नाही; मात्र ज्या विद्यार्थ्यांना आजार असेल, त्यांनी मास्क लावून येणे गरजेचे आहे. यावर्षी शिक्षण खात्याने निकालवाढीसाठी २७ कलमी कार्यक्रम हाती घेतला होता. त्यामुळे बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल चांगला लागेल, असा विश्‍वास जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांनी व्यक्त केला. 

येत्या २७ मार्चपासून सुरु होणाऱ्या दहावीच्या परीक्षेबाबत श्री. पुंडलिक यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे काही परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तसेच पहिली ते सहावीच्या परीक्षा लवकर घेण्याची सूचना केली होती. तेव्हापासून परीक्षांबद्दल विविध प्रकारच्या अफवा व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत आहे. परंतु, शिक्षण खात्याने जाहीर केल्याप्रमाणे २७ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत दहावीची परीक्षा होणार आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जाणार असून यावर्षी प्रत्येक केंद्रावर सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे सक्तीचे केले आहे. नोडल अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक परीक्षा केंद्राला भेट देऊन कॅमेरे बसविल्याची खातरजमा करुन घेतली आहे. ज्या शाळांत कॅमेरे नाहीत, त्यांना भाडोत्री तत्वावर कॅमेरे घेऊन लावण्याच्या सूचना केल्या आहेत, असे म्हणाले.

गेल्यावर्षी दहावीच्या निकालात शैक्षणिक जिल्ह्याची घसरण झाल्याने यंदा निकालवाढीसाठी २७ कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण, तज्ज्ञांकडून शिक्षकांना मार्गदर्शन यासह जुलैपासूनच शाळांमध्ये विशेष कार्यक्रम राबविले. विद्यार्थ्यांतील परीक्षेची भीती कमी व्हावी, यासाठी मार्गदर्शन केले. शाळा सुटल्यानंतर अधिक शिकवणीवर्ग घेण्यात आले. अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग घेण्यात आले. तालुकानिहाय सबजेक्‍ट फोरम कार्यक्रमांचे आयोजन केले. परीक्षा केंद्रावरील मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांना व्हिडिओ कॉन्फरर्सद्वारे मार्गदर्शन केले आहे. यंदा बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ३२,०९१ विद्यार्थी १०४ केंद्रावर परीक्षा देणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

पालक व शिक्षकांनी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. शिक्षण खात्याने सर्व तयारी पूर्ण केली आहे. कोरोनोमुळे विविध प्रकारचे संदेश फिरत असले, तरी परीक्षा वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. शिक्षण खात्याने अधिकृत माहिती दिल्याशिवाय विद्यार्थ्यांनी विश्‍वास ठेवू नये.
-ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

#MyModiStory कशी झाली होती फडणवीस आणि मोदींची पहिली भेट? कार्यक्रम आयोजक ते मुख्यमंत्री...

ITR Filing Deadline: उद्यापासून 5,000 दंड; ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस, 5 मिनिटांत स्वतः करा फाईल

Gold Rate Today : सोने पुन्हा स्वस्त, चांदीचाही भाव कमी, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Sangli IT Bogus Raid : I Am From Income Tax म्हणत मध्यरात्री छापा, डॉक्टरला दीड किलो सोनं अन् १५ लाखांना चुना लावला...

Ashok Saraf : "वक्ख्या विक्खी वुख्खू" फेम अशोक मामांना संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्कार जाहीर, लवकरच कोल्हापुरात सोहळा

SCROLL FOR NEXT