कोल्हापूर

धामणी नदी कोरडी पिके वाळू लागली

CD

01101
....

धामणी नदीचे पात्र कोरडे

कोनोली तर्फ असंडोलीतील चित्र; शेकडो एकरांतील ऊस वाळू लागला

धामोड, ता. २९ : कोनोली तर्फ असंडोली (ता. राधानगरी) येथील धामणी नदी कोरडी पडल्याने शेतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याविना शेकडो एकरांतील ऊस शेती वाळू लागली आहे. येथील शेतकरी वळीव पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
धामणी नदीवरील धामणी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. धामणी नदीवर शेतीला पाण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना समांतर स्वखर्चाने मातीचे बंधारे घालावे लागतात. बंधाऱ्याला सुमारे अडीच लाख रुपये खर्च येत असून किमान अर्धा टीएमसी पाणीसाठा अडवला जातो. राधानगरी, गगनबावडा व पन्हाळा तालुक्यातील ४८ गावांना अशा पद्धतीचे नऊ मातीचे बंधारे घालावे लागतात. सध्या बावेली, कोनोली, पखालीवाडी येथील बंधारे पाण्याविना कोरडे पडले आहेत. त्यामुळे या परिसरात शेतीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.
येथील शेतकऱ्यांनी धामणी नदीत जेसीबीच्या सहाय्याने पाण्यासाठी पंचवीस फूट खोदाई केली आहे. पाण्यासाठी किमान २० हजार रुपये खोदाईसाठी खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. तरीदेखील पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतीचा प्रश्न ‘आ’ वासून उभा राहिला आहे.
...

‘मार्च महिन्यातच यावर्षी बंधाऱ्यातील पाणी पातळी खालावली होती. सध्या धामणी नदी कोरडी पडली आहे . त्यामुळे उसाची शेती पाण्याविना वाळू लागली आहे . वळीव पाऊस आठवड्याभरात झाला तरच शेतातील पिक वाचेल अशी स्थिती आहे.
- प्रकाश पाटील, शेतकरी
01100, 01101

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : राज्यातले सर्व पाणंद रस्ते शेतमालाच्या वाहतुकीसाठी सक्षम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT