कोल्हापूर

भूस्खलनग्रस्त कुपलेवाडीच्या पुनर्वसनाबाबत उदासीनता

CD

भूस्खलनग्रस्त कुपलेवाडीच्या पुनर्वसनाबाबत उदासीनता

प्रशासनाकडून नोटिसा, मात्र कार्यवाही शून्य; पावसाळा आला की येते जाग

सकाळ वृत्तसेवा
धामोड, ता. ४ : पावसाळा सुरू झाला की, प्रशासनाकडून भूस्खलनाच्या कक्षेत येणाऱ्या गावांची चर्चा सुरू होते. तीन वर्षांपूर्वी राधानगरी तालुक्याच्या पश्चिम परिसरातील कोनोली तर्फ असंडोली पैकी कुपलेवाडी येथे भूस्खलनाने एक कुटुंब गाडले गेले. त्यात दाम्पत्यासह पाच जनावरांचा मृत्यू झाला. त्यानंतर अधिकारी व तज्ज्ञ समितीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गावाच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने अनेक वेळा नोटिसा पाठविल्या. मात्र, पुढील कार्यवाही काहीच झाली नाही.
तालुक्याच्या पश्चिम परिसरात अतिवृष्टीचे प्रमाण जास्त असते. निसर्गसंपन्नतेने व विपुल वनाने व्याप्त असलेल्या तालुक्यातील अनेक गावे डोंगराच्या कुशीत वसलेली आहेत. पश्चिम परिसरातील कुपलेवाडी हेही डोंगरकपारीत वसलेले हजार लोकवस्तीचे गाव आहे. जेमतेम ७५ घरांचा उंबरठा. मुळातच हा अतिवृष्टीचा परिसर डोंगरावर पावसाचे पाणी मुरते. तीन वर्षांपूर्वी राधानगरी धरण परिसरात २४ तासांत विक्रमी ५६७ मिलिमीटर पाऊस झाला होता. तेव्हा २५ फूट लांब आणि फूटभर रुंद अशी डोंगराला भेग पडली होती. भूस्खलन होऊन येथील एका घराची भिंत कोसळल्याने सुशीला वसंत कुपले व वसंत लहू कुपले या दाम्पत्यासह पाच जनावरांचा मृत्यू झाला.
पावसाळा सुरू होताच दरवर्षी येथील ग्रामस्थांच्या मनात भूस्खलनाची भीती जागी होते. सलग दोन-तीन दिवस जोराचा पाऊस झाल्यास सुरक्षित निवाऱ्यासाठी लोकांना गावातील शाळेचा आधार घ्यावा लागतो. तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तज्ज्ञ समितीने भूस्खलन झालेल्या क्षेत्राचा व डोंगराचा अहवाल शासनाला सादर केला आहे; परंतु उपाययोजना काहीच झालेल्या नाहीत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोका असलेल्या गावांमध्ये कुलपेवाडीचा समावेश असतो; परंतु पुनर्वसनाबाबत शासन स्तरावरून काहीच उपाययोजना होत नाही.
.............
प्रतिक्रिया...
भूस्खलन झालेल्या क्षेत्राची अधिकारी व तज्ज्ञांकडून पाहणी झाली आहे. दरवर्षी पावसाचा जोर वाढल्यानंतर शासनाकडून सुरक्षितेसाठी नोटिसा पाठविल्या जातात. दरम्यानच्या काळात प्राथमिक शाळेमध्ये निवाऱ्याची सोय केली जाते. मात्र पुनर्वसनाबाबत पुढील कार्यवाही ठप्प आहे.
स्वरूप कुपले, ग्रामस्थ, कुपलेवाडी
....
प्रतिक्रिया...
भूस्खलन झालेल्या क्षेत्राची शासनस्तरावरून पाहणी झाली आहे. गाव डोंगराच्या पायथ्याशी असल्याने ग्रामस्थांना पावसाळ्यात आवश्यक ती काळजी घेण्याबाबतच्या सूचना प्रशासकीय पातळीवरून दिल्या जातात. भूस्खलनाबाबतचे गांभीर्य वरिष्ठ पातळीवर कळवले आहे.
संदीप हजारे, तलाठी, म्हासुर्ली
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT