कोल्हापूर

गावसभेबाबतची उदासीनता चिंतनीय

CD

गावसभेबाबतची उदासीनता चिंतनीय
कबनूरमध्ये कोरमअभावी तहकूब; ग्रामस्थांमध्ये लोकशिक्षण, जागृतीची आवश्यकता
रवींद्र पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कबनूर, ता. १७ ः येथील बुधवारची (ता.१३) गावसभा कोरम अभावी तहकूब केली. ती २६ मे रोजी आयोजित केली आहे. सुमारे साठ हजार लोकसंख्या असलेल्या कबनूर गावामध्ये गावसभेला शंभर ग्रामस्थ उपस्थित राहू शकले नसल्यामुळे गावसभा तहकूब करावी लागली. ही बाब चिंतनीय आहे.
गावसभेमध्ये २०२२-२०२३ चे वार्षिक अहवाल वाचन करणे, २०२३-२०२४ चे अंदाजपत्रक वाचन करणे, वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थी निवड करणे, गावामध्ये विविध ठिकाणी वृक्ष लागवड करणे हे विषय होते. पण गावसभेचा मुख्य उद्देशच लोकांना उमगलेला नसल्याने गावसभेबाबत त्यांच्यात उदासीनता जाणवते. कोरमअभावी तहकुब होणारी गावसभा नंतर तहकूब गावसभा म्हणून घेतली जाते. पण तहकूब गावसभेला ग्रामस्थांच्या संख्येच्या उपस्थितीचे बंधन नसल्याने आणि नियमाप्रमाणे ती घेण्याचे बंधन असल्याने घेतली जाते. त्यामुळे गावसभेचा मूळ उद्देशच बाजूला राहतो.
गावसभा, गावसभेचे अधिकार व कर्तव्य याबाबत ग्रामस्थांमध्ये लोकशिक्षण व जागृती होणे आवश्यक आहे. गावातील विकास कसा करावा? कोणत्या मूलभूत गरजांना प्राधान्य द्यावे? त्याचे प्रतिबिंब गावसभेत उमटले पाहिजे, असा गावसभेचा उद्देश आहे. गावाच्या विकासाच्या प्रक्रियेत गावसभा महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यासाठी ग्रामस्थांनी गावसभेला वेळ देऊन उपस्थित राहणे आणि जागरूकतेने सहभागी होणे आवश्यक आहे. गावसभेमध्ये मागील वर्षी ग्रामपंचायतीने केलेले काम, जमाखर्चाचा अहवाल, चालूवर्षी प्रस्थापित कामे त्यासाठी होणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक ठेवणे आवश्यक आहे. गावसभा राज्य शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या व्यक्तिगत लाभदायक योजनांकरिता लाभधारकांची निवड करते.
ग्रामपंचायतीकडून राबवण्यात येतील अशा सामाजिक किंवा आर्थिक विकासाच्या योजना, कार्यक्रम व प्रकल्प त्यांच्या अंमलबजावणीचे काम त्या ग्रामपंचायतीने हाती घेण्यापूर्वी मान्यता देणे, विकास योजनांवर खर्च करण्याची परवानगी देणे, पंचायतीच्या अधिकारात येणारी कोणतीही जमीन शासकीय प्रयोजनार्थ संबंधित भूमी संपादन प्राधिकरणाद्वारे संपादित करण्याच्या कोणत्याही प्रस्तावासंदर्भात पंचायतीकडून कोणताही निर्णय घेण्यात येण्यापूर्वी पंचायतीला मते कळवणे आदी महत्वपूर्ण अधिकार गावसभेला आहेत.
------------
गावच्या विकासासाठी आवश्यक
गावसभा यशस्वी व परिणामकारक व्हावी म्हणून गावसभेची वेळ ग्रामस्थांच्या सोयीची ठेवणे आवश्यक आहे. गावच्या विकासाच्या प्रक्रियेत गावसभा ही महत्त्वपूर्ण आहे‌. त्यासाठी ग्रामस्थांनी उपस्थितीबाबतची उदासीनता दूर करून सक्रिय सहभाग होणे काळाची गरज आहे. गावच्या विकासासाठी ती अत्यंत आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT