कोल्हापूर

गुंतवणुकदारांची कर्नाटकाला पहिली पसंती ः पंतप्रधान

CD

L80946
बिद्देहळ्ळ (तुमकूर) ः येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी झाली. त्यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व मुख्यमंत्री बसवराज बोम्मई.

गुंतवणूकदारांची कर्नाटकाला
पहिली पसंती ः पंतप्रधान
तुमकूरजवळ हेलिकॉप्टर प्रकल्पाची पायाभरणी

बंगळूर, ता. ६ : आध्यात्मिक असलेल्या कर्नाटकात ड्रोनद्वारे तेजस विमाने बनवली जात आहेत. राज्याला गुंतवणूकदारांची पहिली पसंती असून, हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्पाच्या उद्‍घाटनाने तुमकूर औद्योगिक जिल्हा होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले.
तुमकूर जिल्ह्यातील गुब्बी तालुक्यातील बिदेहळ्ळ कावलजवळ एचएएल हेलिकॉप्टर निर्मिती कारखान्याच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते. यावेळी तिपटूर व चिक्कनायकनहळ्ळी तालुक्यांसाठीच्या जल जीवन मिशन प्रकल्पाची पायाभरणीही झाली. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘कर्नाटक तरुण, प्रतिभा आणि कौशल्यांचे स्थान आहे. दुहेरी इंजिन असलेले सरकार राज्याच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. हेलिकॉप्टर निर्मितीचा कारखाना सुरू झाल्याने हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. तुमकूरच्या आसपास व्यावसायिक व्यवहार वाढतील.’’
गेल्या नऊ वर्षांत एरोस्पेसचा विकास झाला आहे. संरक्षण उपकरणांच्या निर्यातीचे प्रमाण वाढले आहे. आधुनिक असॉल्ट रायफल, विमानवाहू युद्धनौका, अगदी लढाऊ विमानेही देशात तयार केली जातात. संरक्षण उपकरणांची निर्मिती देशात होत असून त्यांचा वापर लष्कराकडूनही केला जात आहे. एचएएलमुळे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढेल. आम्ही आमच्या संरक्षणासाठी परदेशावरील अवलंबित्व कमी केले पाहिजे. हेलिकॉप्टरची निर्मिती आत्मनिर्भर करत आहे. येत्या काही दिवसांत चार लाख कोटींचे व्यावसायिक व्यवहार होणार आहेत.’’
एचएएलचे नाव वापरून आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न झाला. सरकारवर खोटा आरोप करण्यात आला आहे. त्यावर संसदेच्या कामकाजाचे अनेक तास वाया गेले. एचएएलचा हेलिकॉप्टर कारखाना आणि त्याची वाढती ताकद यामुळे खोटे आरोप करणाऱ्यांचा पर्दाफाश होईल, असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला.
तुमकूर, चिक्कबळ्ळापूर, चित्रदुर्ग जिल्ह्यांना अर्थसंकल्पात भद्रा अप्पर बँक प्रकल्पासाठी पाच हजार ३०० कोटींचे अनुदान देऊन फायदा झाला आहे. या प्रकल्पाचा फायदा मध्य कर्नाटकातील भागांना होणार आहे, असे सांगून ते म्हणाले, ‘‘प्रत्येक घराला पाणी देऊ, प्रत्येक जमिनीचे सिंचन करू.
अर्थसंकल्पात धान्यांच्या जाहिरातीला परवानगी देण्यात आली आहे. सशक्त भारत निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पावर जागतिक पातळीवर चर्चा होत आहे, असा दावा करीत ते म्हणाले, ‘‘आम्ही लोकप्रिय, व्यवहार्य अर्थसंकल्प दिला आहे. त्याने सशक्त भारताचे ध्येय आणखी बळकट केले आहे. गतिमान भारताच्या दिशेने टाकलेले सर्वात मोठे पाऊल आहे.’’ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कर्नाटक भारताचे विकास, शांतता आणि सौहार्दाचे भविष्य असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT