कोल्हापूर

अंगणवाडी कर्मचारी युनियनचे सोमवारपासून आंदोलन

CD

जिल्‍हा परिषदेतून...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे
सोमवारपासून आंदोलन
उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां‍ना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १६ : शासनाने मानधन वाढीसह अन्य सुविधा देण्याची घोषणा केली आहे. मात्र या आश्‍‍वासनांची पुर्तता न झाल्याने अंगणवाडी कृती समिती सोमवारपासून (ता.२०) राष्‍ट्रव्यापी बेमुदत संप करणार आहे. याबाबतचे निवेदन राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांच्यातर्फे महिला बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्‍पा पाटील यांना देण्यात आले.
निवेदनात म्‍हटले आहे, अंगणवाडी सेविकांना दरमहा ८३०० ते ८५०० रुपये, तर मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा ५८०० व मदतनीसांना ४२०० रुपये मानधन दिले जाते. शासनाने मानधन वाढ, दरमहा पेन्‍शन, आजारपणाची रजा, दर्जेदार मोबाईल, पोषण ट्रॅकर मराठीत करणे आदी प्रश्‍‍न सोडवण्यासाठी वेळोवेळी निवेदन देण्यात आले. मात्र याची पुर्तता न झाल्याने नाईलाजाने बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. तत्‍पुर्वी शासनाने होणाऱ्या आंदोलनाची योग्य ती दखल घेवून निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन रघुनाथ कांबळे, शुभांगी पाटील, सतिशचंद्र कांबळे, वर्षा लव्‍हटे, शकुंतला कोळी, रेखा पाटील यांच्या शिष्‍टमंडळाने दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HDFC नंतर आता 'या' बँकांनीही वाढवले व्याजदर! कर्जदारांच्या EMI मध्ये वाढ निश्चित; लोन घेणाऱ्यांना मोठा झटका

Iran-America War: इराण-अमेरिकेत 'या' मुद्द्यांवर झाली सहमती? अणुकार्यक्रमावरही तोडगा निघाल्याची माहिती

IND vs AFG 1st ODI: विराटच्या जागी इशान किशन, हार्दिकच्या जागी रेड्डी... पहिल्या वन डे साठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : परळीच्या मिरवट गावात 15 वर्षीय मुलीचा विनयभंग

IND vs AFG 1st ODI: पाऊस थांबायचं नाव घेत नाही...षटकांची संख्या कमी होत चाललीय, आता ट्वेंटी-२० मॅच; जाणून घ्या कट ऑफ टाईम

SCROLL FOR NEXT