कोल्हापूर

आमदार ऋतूराज पाटील

CD

निराधार योजना अनुदान
तीन हजारांपेक्षा जास्त करावे
---
आमदार ऋतुराज पाटील; विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे मागणी
कोल्हापूर, ता. ३ ः संजय गांधी निराधार, श्रावणबाळ तसेच अन्य योजनांतील लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम तीन हजार रुपयांपेक्षा जास्त करावी, दिव्यांग व्यक्तींप्रमाणेच बाकीच्या लाभार्थ्यांसाठी उत्पन्न मर्यादा २१ हजारवरून ५० हजार करावी, निराधार लाभार्थ्यांच्या मुलांच्या वयाची अट काढून टाकावी, तसेच शासन निर्णयाप्रमाणे सर्व योजनांचे अर्ज तलाठी कार्यालयात स्वीकारण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशा मागण्या आमदार ऋतुराज पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केल्या.
योजनांची अंमलबजावणी करताना त्यातील अटी जाचक ठरत आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत लाभार्थ्यांची मुले २५ वर्षांची झाली की लाभार्थ्यांचे अनुदान बंद होते. वाढत्या बेरोजगारीबरोबरच बऱ्याच ठिकाणी ही मुले आई-वडिलांना सांभाळत नाहीत, असे चित्र आहे. त्यामुळे ही अट काढावी. योजनांतील अर्जदारांच्या सोयीसाठी २० ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार संबंधित अर्जदाराने आपला अर्ज तो राहत असलेल्या भागातील तलाठ्याकडे जमा करावा. तलाठ्यांनी प्राप्त अर्जांची व त्याबरोबरच्या कागदपत्रांची छाननी करून तो अर्ज नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांच्याकडे पाठवावेत, असे नमूद केले आहे. मात्र, अर्जदार तलाठ्यांकडे अर्ज द्यायला गेले तर त्यांना तहसील कार्यालयात अर्ज जमा करण्यासाठी सांगितले जाते, असे आमदार श्री. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, सर्व मागण्यांबाबत विभागाने सकारात्मक विचार केलेला आहे. लवकरात लवकर या सर्व विषयांबाबत मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर केला जाईल. निराधार आणि गरिबांना आधार देण्याचे काम राज्य शासन करेल, असे मंत्री संजय राठोड यांनी या वेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT