‘समतेच्या चौकटीतील वाटचाल
घडविणे हे लोकशाहीचे मूल्य’
कोल्हापूर, ता. १३ : ‘‘लोकसाहित्य हा लोकशाहीचा आत्मा आहे. भाषेचा सूर जुळतो, तेव्हा लोकशाही खऱ्या अर्थाने फुलते. लोकशाहीमध्ये भाषा ही ताकद पोहोचविणारी असते. समतेच्या चौकटीतील वाटचाल घडविणे हे लोकशाहीचे मूल्य आहे,’’ असे मत डॉ. प्रकाश पवार यांनी व्यक्त केले.
‘वाय--20 इंडिया अवेअरनेस प्रोग्राम’चे बीजभाषक म्हणून ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय शिखर संस्था ‘जी-20’तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘वाय-२०'' उपक्रमाचे सन२०२३ चे यजमानपद भारताकडे आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून विविध देशातील युवकांनाही त्यांचे मत मांडणे, चर्चा करण्याच्या दृष्टीने ''यूथ-20’ या कार्यक्रमाचे आयोजन युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाने केले आहे.
या ‘वाय-20’ उपक्रम राबविण्यासाठी जिल्ह्यातून न्यू कॉलेजची निवड केली. ''वाय- 20 इंडिया अवेअरनेस प्रोग्राम’चे उद्घाटन श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन के. जी. पाटील यांच्या केले. उपप्राचार्य डॉ. ए. एम. शेख यांनी स्वागत केले. डॉ. आर. एस. जाधव यांनी परिचय करून दिला. डॉ. मनीषा नायकवडी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ए. आर. कांबळे (जगतकर) यांनी आभार मानले. परीक्षक डॉ. जी. एस. राशिनकर, डॉ. महेंद्र जाधव यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन केले.
यशस्वी विद्यार्थी असे : पोस्टर स्पर्धा : ऋतुजा पाटील (प्रथम), सामवेद ढणाल (द्वितीय), सुप्रिया पाटील (तृतीय), ऋतुजा माने (उत्तेजनार्थ), पल्लवी शिंदे (उत्तेजनार्थ), वक्तृत्व स्पर्धा : श्रेया म्हापसेकर (प्रथम), समृद्धी पताडे (द्वितीय), स्नेहल मगदूम (तृतीय), अतिश कांबळे (उत्तेजनार्थ), विश्वजीत पाटील ( उत्तेजनार्थ).
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.