कोल्हापूर

नोकर भरतीचा सामंजस्य करार प्राप्‍त

CD

जिल्‍हा परिषदेतून....

नोकर भरतीचा सामंजस्य करार प्राप्‍त;
अटीशर्तींचा समावेश नसल्याने नाराजी

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता.१७ : जिल्‍हा परिषद नोकर भरतीसाठी आयबीपीएस कंपनीची निवड केली आहे. मात्र, परीक्षा घेण्यापासून ते निकालापर्यंतच्या विविध टप्‍प्यांवर जबाबदारीचे विभाजन करणे, कंपनीवरच संपूर्ण परीक्षा प्रक्रियेची जबाबदारी सोपवणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत जिल्‍हा परिषदेने लेखी पत्र दिले होते. मात्र, त्यातील अटीशर्तींचा सामंजस्य करारात समावेश नसल्याने जिल्‍हा परिषदेसमोर पेच निर्माण झाला आहे.
राज्य शासनाने नोकर भरतीची घोषणा केली आहे. नोकर भरतीची बहुतांश जबाबदारी खासगी कंपनीवर सोपविली आहे. शासनाने निश्‍चित केलेल्या कंपनीसोबत करार करून ही नोकरभरती केली जाणार आहे. सुरुवातीला जिल्‍हा परिषदेने टाटा कन्‍सल्टन्‍सी सर्व्हिसेसशी करार केला होता. मात्र, या कंपनीकडे कामे जास्‍त असल्याने त्यांनी जिल्‍हा परिषदेच्या नोकर भरतीस नकार दिला. यानंतर आयबीपीएस कंपनीसोबत करार करण्याचा निर्णय झाला. असे असले तरी भरती प्रक्रियेतील नेमकी कंपनीची व जिल्‍हा परिषदेची जबाबदारी काय, हाच वादाचा विषय बनला आहे. इतर जिल्‍हा परिषदांतही अशीच परिस्‍थिती आहे.
नोकर भरतीसाठी पदनिश्‍चिती करणे, रो‍स्टर मंजुरी, विभाग व पदनिहाय रिक्‍त जागा, आरक्षण या सर्वांची जबाबदारी जिल्‍हा परिषदेने घेतली आहे. मात्र, प्रश्‍‍नपत्रिका काढणे, फॉर्म मागवणे, फी घेणे, निकाल लावणे तसेच पेपर फेरतपासणी, कालमर्यादा या सर्वांबाबत निश्‍चित अशी कार्यपद्धती झालेली नाही. त्यामुळे परीक्षा कंपनी घेणार व वाद निर्माण झाल्यास त्याचा त्रास जिल्‍हा परिषदेला, अशी काहीशी परिस्‍थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जिल्‍हा परिषदेने जबाबदारीबाबत काही शंका व्यक्‍त केल्या होत्या. तसेच अटीशर्तींचा उल्‍लेख करून त्याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते. मात्र शासनाकडून जो करार प्राप्‍त झाला आहे, त्यात जिल्‍हा परिषदेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जिल्‍हा परिषदस्‍तरावर अनेक प्रश्‍‍न निर्माण झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT