Kolhapur  sakal
कोल्हापूर

Kolhapur : पालेभाज्या कडाडल्या; टोमॅटो उतरले, समुद्री माश्यांची आवक अंतिम टप्यात

हिरवी मिरची, ढब्बू, दिडगा, गवार यांचे दरातील तेजी कायम आहे. सरासरी ६० ते ८० रुपये किलो दर आहे. कांद्याचा दर स्थिर असून क्विंटलचा ६०० ते ११०० तर किळकोळ बाजारात किलोचा १५ ते २५ रुपये किलो दर आहे.

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज - येथील भाजी मंडईत उन्हाळ्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून मागणीपेक्षा आवक कमी असल्याने पालेभाज्या कडाडल्या आहेत. तुलनेत टोमॅटोची आवक अधिक असल्याने दर उतरले आहेत. मटण मार्केटमध्ये समुद्री माश्यांची आवक अंतिम ठप्प्यात असल्याने दर वधारले आहेत. सरासरी २५ ते ४० टक्के दर वाढले आहेत.

गवार, बिन्स, आल्याची दरातील तेजी टिकून आहे. फळबाजारात कलिंगडाची आवक कमी झाली आहे. ओल्या भुईमूागाच्या शेंगाची आवक वाढली आहे. वाढत्या उष्म्यामुळे कोंथबिर, पालेभाज्यांची आवक कमी आहे. केवळ पन्नास टक्के आवक सीमाभागातून सुरू आहे. यामुळे पालेभाज्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. आकारानुसार पेंढीचा १५ ते २० रुपये असा दर आहे. शेवगा, कांदापातचा दरही अधिक आहे.

हिरवी मिरची, ढब्बू, दिडगा, गवार यांचे दरातील तेजी कायम आहे. सरासरी ६० ते ८० रुपये किलो दर आहे. कांद्याचा दर स्थिर असून क्विंटलचा ६०० ते ११०० तर किळकोळ बाजारात किलोचा १५ ते २५ रुपये किलो दर आहे. बटाटा १४००- १८०० क्विंटल तर किलोचा २० ते २५ किलोचा भाव आहे. लिंबू, आल्याचे दर वाढलेले दर कायम आहेत. दहा किलोचे दर असे भेंडी, वांगी, दोडका २००, टोमँटो १५०, कोबी ३००, बिन्स, गवार ६००, काकडी ४००, कोंथिबिर १३०० शेकडा पेंढी.

महिन्याभरापासून मच्छी बाजारात कोकणातून येणाऱ्या समुद्री माश्यांची आवक कमी झाली आहे. मच्छीमारीला एक जूनपासून पायंबद घातल्याने सध्याची आवक बंद होणार असल्याचे विक्रेते आसिफ बोजगर यांनी सांगितले. त्यामुळे सुरमई, पापलेट यांचे दर वाढले आहेत. किलोमागे २०० ते ४०० रुपयांनी दर वधारले आहेत. नदी, तलावातील माश्यांची आवक स्थिर आहे.

किलोचे दर असे : सुरमई १२००, पापलेट १६००, रावस ५००, प्रॅाझ ६००, बोंबील ३००, कटला, मांदेली, खेकडा २००, रहू १६०, बांगडा १६० रुपये. फळबाजारात आंबे सोडून सर्वच फळांची आवक मंदावली आहे. सफरचंद १४०- २००, डाळींब, चिक्कू, मोसंबी ८०- १०० रुपये किलो आहेत.

कलिंगडाची आवक अंतिम ठप्प्यात असल्याने दर वाढले आहेत. बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात उन्हाळ्यामुळे आवक मंदावली आहे. सुमारे सत्तर टक्के आवक कमी झाल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. पाऊस सुरु झाल्यानंतर ही आवक पुर्वतत होणार असल्याचे विक्रेत्यांनी माहिती दिली.

फळांचा राजा बहरला
गेल्या आठ दिवसापासून फळ बाजारात स्थानिक आंब्याची आवक वाढली आहे. मार्च महिन्यापासून फळांचा राजाची आवक सुरु झाली होती. पण, कोकणातून आवक न वाढल्याने हाफूस आंब्याचे दर मे मध्यापर्यंत चढेच राहिले.

परिणामी, सर्वसामान्यांसाठी आंबा आंबटच राहिला. कर्नाटकी आंब्यामुळे ग्राहकांची फसवणूक झाली. स्थानिक आवक वाढल्याने दर थोडे उतरले आहेत. डझनाचा ३०० ते ५०० रुपयापर्यंत दर आहे. आठवडा बाजारात शंभरहुन अधिक विक्रेते आंब्याची विक्री करीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT