Sugar Factory Maharashtra
Sugar Factory Maharashtra esakal
कोल्हापूर

Kolhapur : ..तर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही; राज्य ऊसतोडणी-वाहतूक संघटनेचा थेट इशारा

सकाळ डिजिटल टीम

कोल्‍हापूर : राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या कामास ग्रामसेवक संघटनेने विरोध केला आहे. त्यांच्या या कृतीचा निषेध करत असून, पुढील हंगामापूर्वी ओळखपत्र न दिल्यास, साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेने दिला. याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां‍कडे देण्यात आले.

कामगार नोंदणीसाठी जिल्‍हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. मागील तीन वर्षातील उसतोडणी व वाहतूक कामगारांची माहिती साखर कारखान्यांकडून संकलित करण्यात आली आहे. ही माहिती जिल्‍हा परिषदेकडे सादर करण्यात आली आहे. असे असतानाही ग्रामसेवक संघटनेने ओळखपत्र देण्यास विरोध केला आहे.

त्यांची ही कृती निषेधार्ह असून उपेक्षित कामगारांना त्रास देणारी आहे. कोणत्याही परिस्‍थितीत ओळखपत्र घेतल्याशिवाय राहणार नाही. शासनाने कोणत्याही यंत्रणेमार्फत ओळखपत्र देण्याची व्यवस्‍था करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जोपर्यंत ओळखपत्र मिळत नाही, तोपर्यंत जिल्‍ह्यातील संपूर्ण ऊसतोड बंद ठेवू, असा इशारा संघटनेने दिला आहे.

हे निवेदन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब चौगले, राज्य सरचिटणीस प्रा.सुभाष जाधव, दिनकर आदमापुरे, पांडूरंग मगदूम, आनंदा डफळे,नामदेव जगताप, रामचंद्र कांबळे, रंगराव राबाडे आदी उपस्‍थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT