Sugar Factory Maharashtra esakal
कोल्हापूर

Kolhapur : ..तर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही; राज्य ऊसतोडणी-वाहतूक संघटनेचा थेट इशारा

'कोणत्याही परिस्‍थितीत ओळखपत्र घेतल्याशिवाय राहणार नाही'

सकाळ डिजिटल टीम

कोल्‍हापूर : राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या कामास ग्रामसेवक संघटनेने विरोध केला आहे. त्यांच्या या कृतीचा निषेध करत असून, पुढील हंगामापूर्वी ओळखपत्र न दिल्यास, साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेने दिला. याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां‍कडे देण्यात आले.

कामगार नोंदणीसाठी जिल्‍हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. मागील तीन वर्षातील उसतोडणी व वाहतूक कामगारांची माहिती साखर कारखान्यांकडून संकलित करण्यात आली आहे. ही माहिती जिल्‍हा परिषदेकडे सादर करण्यात आली आहे. असे असतानाही ग्रामसेवक संघटनेने ओळखपत्र देण्यास विरोध केला आहे.

त्यांची ही कृती निषेधार्ह असून उपेक्षित कामगारांना त्रास देणारी आहे. कोणत्याही परिस्‍थितीत ओळखपत्र घेतल्याशिवाय राहणार नाही. शासनाने कोणत्याही यंत्रणेमार्फत ओळखपत्र देण्याची व्यवस्‍था करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जोपर्यंत ओळखपत्र मिळत नाही, तोपर्यंत जिल्‍ह्यातील संपूर्ण ऊसतोड बंद ठेवू, असा इशारा संघटनेने दिला आहे.

हे निवेदन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब चौगले, राज्य सरचिटणीस प्रा.सुभाष जाधव, दिनकर आदमापुरे, पांडूरंग मगदूम, आनंदा डफळे,नामदेव जगताप, रामचंद्र कांबळे, रंगराव राबाडे आदी उपस्‍थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP जॉइन करा अन् दर महिन्याला 50 हजार कमवा! असा मेसेज सगळीकडे का होतोय व्हायरल? यामागचा स्कॅम पाहून बसेल धक्का

Pune Riksha Fare: पुणेकरांना मोठा झटका! रिक्षाभाडेवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात; लवकरच नवे दर हाेणार लागू

Almatti Dam Controversy : आलमट्टीच्या उंचीवरून कर्नाटकची मनमानी! महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे; तज्ज्ञांचं आवाहन, काय म्हणाले केंगार?

Latest Marathi News Live Update : पंढरपूरच्या वारीवरून परतताना काळाचा घाला! ३ वाहनांचा भीषण अपघात

Child Murder Case: एआयच्या मदतीने चिमुकल्याची हत्या! बिश्नोई गँगच्या नावाने १९९ रुपयांत सिमकार्ड खरेदी; कसा रचला भयानक कट?

SCROLL FOR NEXT