कोल्हापूर

...भरपाई न दिल्यास मतदानावर बहिष्कार!

CD

80519
आजरा : येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आंदोलनानंतर महामार्ग बाधित शेतकऱ्यांना लेखी पत्र देताना एम. एस. मेत्री. यावेळी शिवाजी गुरव व शेतकरी.
...
भरपाई न दिल्यास मतदानावर बहिष्कार
आजऱ्यातील १३ गावांतील महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा इशारा : पाच मेपर्यंत डेडलाईन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २९ : संकेश्वर-बांदा महागार्माचे काम सुरू आहे. महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. तसेच त्या जमिनीमधील फळझाडे, मेसकाटी, बांबू बेटे, घरे, विहिरी व कूपनलिकाही उद्ध्वस्त झालेल्‍या आहेत. त्याची रितसर नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. पाच मेपर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्यास १३ गावे मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत, असा इशारा महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन भुदरगड-आजऱ्याच्‍या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी शिवाजी गुरव म्हणाले, ‘याकामी मोर्चे काढले, आंदोलने केली, ज्या त्या कार्यालयाचे अधिकारी व शासन, आमदार, खासदार यांना निवेदने दिली. तरीही आजतागायत कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई व बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे होणारे नुकसान अद्याप मिळालेले नाही. असे असताना रस्ता महामार्गाचे ठेकेदार यांनी ९० टक्के काम पूर्ण केलेले आहे. यासाठी भूसंपादन अधिकारी (उपविभागीय अधिकारी, गारगोटी) यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये ३१ मार्चपर्यंत निवाड्याची रक्कम अदा करण्याचे मान्य केले होते. त्यानंतर आता आम्हा शेतकऱ्यांना फक्त निवाडा नोटिसा दिलेल्या आहेत. अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. काही शेतकऱ्यांच्या जमिनी वाढीवमध्ये दुसरा निवाडा करण्याचे ठरले आहे. तो सुध्दा अद्याप झालेला नाही. ज्या शेतकऱ्यांनी निवाडा नोटीसप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करून दिलेली आहे. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम अद्याप मिळालेली नाही.
निवाडा रकमेपैकी २० टक्के कपात न करता रक्कम मिळावी व रेडिरेकनर दराच्या चौपट रक्कम आम्हा शेतकऱ्यांना मिळावी. ही नुकसान भरपाई पाच मेपर्यंत न मिळाल्यास आजरा तालुक्यातील १३ गावांतील शेतकरी व गडहिंग्लज तालुक्यातील तीन गावांतील शेतकरी मिळून मतदानावर बहिष्कार टाकतील, असा इशारा दिला आहे. निवेदनावर शिवाजी गुरव, सुरेश लोहार, दयानंद लोहार, शिवाजी बाबर, बापूसाहेब शेळके, सुहास गुरव, भारती पोवार यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
...
सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयासमोर आंदोलन
संकेश्वर-बांदा व राज्यमार्ग बाधित शेतकऱ्यांनी आज सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. राज्य व जिल्हा मार्गाचे शेतकऱ्यांना न विचारता रुंदीकरण केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. सहायक अभियंता एम. एस. मेत्री यांनी याबाबत लोकसभा निवडणुकीनंतर बैठक लावण्याची ग्वाही दिली. याबाबतचे लेखी पत्र आंदोलकांना दिले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेतले. यावेळी शिवाजी गुरव, गणपतराव येसणे, शिवाजी इंगळे, शंकर पुंडपळ, सदू शिवणे, विशाल गुरव, आनंदा येसणे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

London Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान दुर्घटनेची आता लंडनमध्ये पुनरावृत्ती

Wimbledon 2025 Final: यानिक सिनरने वचपा काढला,अल्काराजला हरवत जिंकलं विम्बल्डनचं विजेतेपद

ENG vs IND: भारतासमोर सोप्पं लक्ष्य, पण इंग्लंडनेही कसली कंबर; 3rd Test जिंकण्यासाठी शेवटच्या दिवसाचं कसं समीकरण?

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

Mumbai News: रेल्वेतच महिलेला प्रसुतीकळा, खाकी वर्दीतल्या देवदूताची धाव; माय लेकाचा वाचवला जीव

SCROLL FOR NEXT