kolhapur rain esakal
कोल्हापूर

Kolhapur Rain Updates: पालकमंत्री साहेब, शहरातून फेरफटका माराच...कोल्हापूरचं झालं डबकं, नागरिकांचा टाहो

Kolhapur News: जीवघेणे खड्डे बुजवलेच नाहीत : पाणी साचून राहिल्याने अपघातांचे प्रमाण वाढले

CD

कोल्हापूर, ता. १९ : कोल्हापूरचं डबकं झालं आहे... खड्डे तर कोल्हापूरकरांच्या पाचवीलाच पुजल्याची स्थिती आहे. शहरात ठिकठिकाणी खड्ड्यात पाणी साचून राहिल्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. अमृत योजनेच्या पाईप लाईनसाठी खोदाई झाली, मात्र मुरूम टाकून बुजविणे शक्य झाले नाही. परिणामी प्रवासी, नागरिकांच्या माथी अडथळे मारून ठेवले आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी खड्डे बुजविण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्याला केराची टोपली मिळाल्याची स्थिती आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना खड्ड्यातून, डबक्यातूनच पुढे जावे लागत आहे. एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाकडून याची दखल घेतली जाणार काय? असाही सवाल उपस्थित होत आहे.

शिवाजी उद्यमनगर ते वाय. पी. पोवार नगरातील मुख्य रहदारीच्या रस्त्यावर अमृत योजनेची खोदाई झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक होत नाही. त्याच्या उलट दिशेला खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणे म्हणजे डबक्यातूनच जावे लागते. शिवाजी उद्यमनगर चौकात गेली पाच वर्षे असलेला खड्डा अद्याप बुजवलेला नाही.

रेड्याची टक्कर, शास्त्रीनगर मार्गावर सुद्धा खड्डेच खड्डे आहेत. रंकाळा टॉवर चौकातील जावळाचा गणपती, बिंदू चौक, सीपीआर चौक, मंडलिक वसाहत, बालकल्याण संकुल समोरील नंगीवली चौक परिसर ते रेसकोर्स नाका, बिनखांबी गणेश मंदिर निवृत्ती चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, सायबर चौक, खरे मंगल कार्यालय, राजारामपुरी पोलिस ठाणे, शिवाजी उद्यमनगर चौक ते माऊली चौक, बागल चौक ते बी. टी, कॉलेज, मंडलिक वसाहत ते सावंत कोचिंग क्लासेस, हॉकी स्टेडियम खाऊ गल्लीजवळ, साई मंदिर कळंबा रिंग रोड, परीख पूल या ठिकाणचे खड्डे अद्याप बुजविलेले नाहीत.

हतबल नागरिकांकडून तुटपुंजे उपाय

पालकमंत्र्यांच्या आदेशाला कोण विचारते की नाही, अशी स्थिती आज शहरात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील खड्डे बुजविणे आवश्‍यक होते. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. आता अनेक खड्ड्यांत पाणी साठून अपघात होत असल्यामुळे स्थानिक नागरिक खड्ड्यात रोपटे लावत आहेत. काही ठिकाणी खड्ड्यांच्या भोवती दगड ठेवले जात आहेत.

तरच समजतील हाल...

मार्केट यार्ड मार्गावरील रेल्वे गुडस यार्डकडे जाणाऱ्या रस्त्यावरून पालकमंत्री आणि महापालिका अधिकारी दुचाकीवरून जावे म्हणजे त्यांना नागरिकांना प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची त्यांना जाणीव होईल. शहरातील नागरिक त्रास सहन करतात याचा गैरफायदा प्रशासनाकडून आणि नेत्यांकडून घेतला जात आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची त्यांना थोडीही कदर नसल्याची जाणीव आज शहरातील रस्त्यांवरून फिरताना जाणवते. अनेक ठिकाणी ड्रेनेजचे मॅनहोलसुद्धा डोकेदुखी आहेत, अशा प्रतिक्रियाही आता उमटू लागल्या आहेत.

रस्त्यावरील जीवघेणे खड्डे

बिनखांबी गणेश मंदिर ते निवृत्ती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चेंबरजवळ पडलेला खड्डा जीवघेणा बनला आहे. नागरिकांनी तक्रार करूनही महापालिकेने केवळ बॅरिकेड लावून उपाययोजना केली आहे. वर्दळीच्या असलेल्या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे.

या रस्त्यावर मध्यभागी असलेल्या ड्रेनेज चेंबरच्या बाजूलाच जवळपास पंधरा दिवसांपूर्वी खड्डा पडला. चेंबरच्या बाजूचा भाग पोकळ झाल्याने हा खड्डा खोल झाला. त्यात दुचाकीचे चाक जाऊन अपघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी तक्रार केल्या. त्यानंतर त्या खड्ड्यात दगड, मुरुम टाकून तो बुजवण्याचा प्रयत्न केला. पण खड्डा पुन्हा पडला.

त्यावेळी बॅरिकेड लावून त्यातून वाहने जाऊ नयेत याची दक्षता घेण्यात आली. त्यालाही बरेच दिवस झाले तरी त्यानंतर पुढे काही केलेले नाही. रस्त्याच्या मध्यभागी असलेले ते बॅरिकेड रात्री दिसत नाही. या रस्त्यावर मोठी वर्दळ आहे. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT