Tourism day special Businessman face challenge to make up for loss of Rs 50 crore 
कोल्हापूर

पर्यटन दिन विशेष : आगामी पर्यटनासाठी पर्यटक आतूर

शिवाजी यादव

कोल्हापूर : पर्यटनातून ग्रामीण विकास, अशी संकल्पना घेऊन यंदाचा पर्यटन दिवस साजरा होत आहे. मात्र, कोरोनाच्या संकटात पर्यटन ठप्प झाले. यात परदेशी पर्यटनाला जवळपास ५० कोटींचा फटका बसला आहे. संपूर्ण लॉकडाउन उठल्यानंतर पर्यटन पुन्हा जोमाने सुरू होईल. त्यासाठी पर्यटन व्यावसायिक आतूर आहेत. 

परदेशी पर्यटन सेवा देणाऱ्या जवळपास ५० ट्रॅव्हल्स एजन्सी येथे आहेत. त्यांच्याकडे कोल्हापुरातून महिन्यात सरासरी २० ते ४० कुटुंबांचे परदेशी पर्यटनासाठी बुकिंग होते, कोरोना येण्यापूर्वी येथील पर्यटकांनी विदेशी पर्यटनाचे बुकिंग केले. युरोप, मॉरेशीस, लंडन, थायलंड, मलेशिया, बॅंकॉक, सिंगापूर, दुबई, मालदीव आदी देशात पर्यटन करण्यासाठी पर्यटकांनी पैसे भरून ट्रॅव्हल्स एजन्सीकडे बुकिंग केले.


दीड ते तीन लाखांची पॅकेज घेतली. ट्रॅव्हल्स कंपन्यांनीही परदेशात हॉटेल बुकिंग व विमान प्रवासाचे बुकिंग केले. पुढे लॉकडाउन झाला. विमान सेवा बंद झाली, त्यानंतर दोन महिन्यांत सर्व पूर्ववत सुरू होईल, असे वाटत होते; मात्र पुढे आणखी तीन महिने विमान सेवा बंद राहिली अजूनही कोरोनावर लस येत नाही. अशा स्थितीत परदेशी पर्यटनासाठी बुकिंग केलेल्या पर्यटकांपैकी काहींनी पैसे परत मागितले; पण ज्या ट्रॅव्हल्स कंपन्यांनी परेदशात हॉटेल बुकिंग केले किंवा विमानाचे तिकीट बुकिंग केले आहे. त्यांनीही संबंधित ट्रॅव्हल्स एजन्सीना पैसे परत दिलेले नाहीत. 


त्यामुळे परदेशी पर्यटन रद्द केल्याने स्थानिक ट्रॅव्हल्सवाले पैसे परत देणेही अवघड झाले आहे. बहुतांशी पर्यटकांनी पैसे परत मागण्याऐवजी पुढे पर्यटनासाठी पुढची तारीख मागितली आहे. 
‘‘परदेशात जाण्यासाठी ज्यांनी यापूर्वी बुकिंग केले होते. त्यासाठी काही कोटींची गुंतवणूक झाली, मात्र विमानसेवा बंद असल्यामुळे ज्यांचे पर्यटन होऊ शकलेले नाही, अशांना ‘क्रेडिट सेल’ या प्रकारात पुढे प्रवास व पर्यटनाची सेवा देण्यात येईल. बंद असलेली विमानसेवा कोरोनाची लस आल्यानंतर सुरू होईल, तरीही अनेक पर्यटक परदेशी पर्यटनासाठी इच्छुक आहेत. त्यांच्याकडून पर्यटनाची चौकशीही सुरू झाली आहे.
- रवींद्र पोतदार, व्यवस्थापक गिरीकंद ट्रॅव्हल्स 
    
‘‘वर्षाला कोल्हापुरातून किमान ५ ते १० हजार लोक परदेशात जातात. तेवढेच परदेशातून कोल्हापुरात येतात. येथील हॉटेलांपासून ते स्थानिक पर्यटन सुविधा ठप्प आहेत. येथील अर्थकारणावर परिणाम झाला आहे. विमानसेवा सुरू झाली, तर परदेशी पर्यटक कोल्हापुरात येऊन येथील अर्थकारणाला गती मिळेल.’’
- जय देशपांडे, पर्यटन सल्लागार.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT